आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या कृत्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची म्हणाले, ‘नावे बदलण्याचा प्रयत्न केल्याने वास्तव बदलणार नाही. तो अविभाज्य भाग आहे आणि राहील. भारतात जी-२० व शांघाय सहकार्य संघटनेचे कार्यक्रम सुरू असतानाच चीनने कूटनीतीची चाल खेळली आहे.
त्यात आक्रमकता दाखवताना चीनने बीजिंगमध्ये भारतासाठी वार्तांकन करणाऱ्या चार भारतीय पत्रकारांना चीन सोडून जाण्यास सांगितले. दोन पत्रकार सुटीवर मायदेशी आलेले आहेत. बाकी दोघांना परत येऊ नका, असे बजावले. अलीकडेच भारतात चीनच्या पत्रकारांना व्हिसा देण्यात आलेल्या अडचणींचा सूड म्हणून चीनने हे पाऊल उचलले. चीनच्या या निर्णयावर परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अरुणाचलच्या ११ ठिकाणांची नावे बदलण्याच्या कृत्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.