आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांच्या विधानानंतर काँग्रेसने तवांग प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 7 प्रश्न विचारलेत. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकार चीनच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्यास का घाबरत आहे? PM मोदी देशाला विश्वासात का घेत नाहीत?
जयराम रमेश म्हणाले की, चीनच्या मुद्याशी संबंधित प्रश्नांवर देशाला विश्वासात घेणे ही पंतप्रधानांची जबाबदारी व कर्तव्य आहे. ते सोशल मीडियावर म्हणाले - मागील 100 दिवसांपासून भारतीय जनतेच्या वेदना, आशा व आकांक्षा ऐकत एका दिवसात 20-25 किलोमीटर चालणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे लोक टीका करत आहेत. असे राजकारण थांबले पाहिजे. पंतप्रधानांनी चीनच्या मुद्यावर देशाला उत्तर दिले पाहिजे.
काँग्रेसचे 7 प्रश्न
काँग्रेसने विचारले - भाजपचा चीनसोबत संबंध काय
काँग्रेसने विचारले की, चीनच्या ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना वारंवार का ठेका दिला जातो? तुमचे चीनशी कोणते नाते आहे? अखेरीस यामागे कोणते रहस्य आहे?
उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत चीन युद्धाची तयारी करत असल्याचा व केंद्र सरकार झोपल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर पलटवार करताना भाजपने गांधी कुटुंबावर निशाणा साधत राहुल यांचे विधान देशविरोधी असल्याचा दावा केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.