आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोनारुग्णांची संख्या 67 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 67 लाख 54 हजार 179 लोक संक्रमित झाले. 24 तासांत 71 हजार 869 नव्या रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 57 लाख 41 हजार 153 लोक बरे झाले आहेत. मंगळवारी 81 हजार 945 रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या 9 लाख 7 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 30 दिवसांत अॅक्टीव्ह रुग्णांचा दर खालच्या स्तरावर गेला आहे. हा देशासाठी चांगला संकेत आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 4 हजार 591 लोकांचा मृत्यू झाला आहे.
प्लाझ्मा थेरपी मृत्यूदर कमी करू शकत नाही
दरम्यान, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे की मृत्यू दर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले की, अभ्यासात असे आढळले आहे की प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यू रोखता येत नाहीत.
48% मृत्यू देशातील 25 जिल्ह्यांत झाले
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोनामुळे आतापर्यंत 48% मृत्यू 8 राज्यांतील 25 जिल्ह्यांत झाले आहे. यामध्ये 15 जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आहेत. 2 कर्नाटक, 2 पश्चिम बंगाल, 2 गुजरात आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील प्रत्येकी 1 जिल्ह्याचा समावेश आहे. म्हणजे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा सर्वाधिक परिणाम या जिल्ह्यात दिसून आला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मृत्यू दर 1% पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
भारतात कोरोनाचा पीक येऊन गेला, पीक घोषित केल्यास लोक निष्काळजीपणा करतील
डब्ल्यूएचओच्या निकषांनुसार, भारतात कोरोनाचा पीक येऊन गेला. आता दुसरी लाट रोखण्यासाठी खबरदारी गरजेची आहे. देशात 22 सप्टेंबरपासून 5 ऑक्टाेबरपर्यंत सलग 14 दिवस कोरोनाच्या सक्रिय रुग्णवाढीचा दर शून्याखाली राहिला आहे. डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार, जगातील सर्वच देशांत याच आधारे पीक घोषित झाला होता. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले, आकडेवारीच्या आधारे पीक घोषित केला तर लोक निष्काळजीपणा करतील. सणासुदीत आपण आणखी काळजी घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.