आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची तिसरी लाट जगात येईल यात काही शंका नाही. हे लक्षात घेता कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पुढील 100 ते 125 दिवस महत्त्वाचे असल्याचा इशारा सरकारने दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की रोजच्या प्रकरणांमध्ये होणारी घट आता वाढली आहे. ही धोक्याची घंटा आहे. तिसरी लाट येऊ देऊ नये असे टार्गेट पंतप्रधान मोदींनी दिले आहे.
नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, आपण निष्काळजीपणा करु शकत नाही हे दुसऱ्या लाटेवरून शिकलो आहोत. हा विषाणू खूप चतुर आणि धूर्त आहे. ते म्हणाले की, जुलैपूर्वी आम्ही लसचे 500 कोटी डोस देण्याच्या आमच्या लक्ष्याकडे जात आहोत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या 66 कोटी डोसची ऑर्डर सरकारने दिली आहे. याशिवाय 22 कोटी डोस खासगी क्षेत्राला देण्यात येणार आहेत.
4.30 लाख सक्रिय प्रकरणे शिल्लक
देशात कोविड लसीकरणाच्या 39.4 कोटी डोसचा आकडा पार झाला आहे. पहिल्या डोसमध्ये 31.6 कोटी लस देण्यात आल्या, तर दुसर्या डोसमध्ये 7.92 कोटी लस दिल्या गेल्या. दुसर्या लाटे दरम्यान लसीकरणामुळे डेथ रेट कमी करण्यात मदत मिळाली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, 10 मे रोजी कोरोनाची सक्रिय प्रकरणे जवळपास 37 लाख होती, ती आता कमी होऊन जवळपास 4.30 लाख राहिली आहेत.
रिकव्हरी रेट वाढला
लव्ह अग्रवाल म्हणाले की 12 मे रोजी कोरोनातून रिकव्हरी रेट 83% होते, ते आता वाढून 97.3% झाले आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात 531 जिल्ह्यांमध्ये दररोज 100 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत होती. देशात आता असे फक्त 73 जिल्हे शिल्लक आहेत. ते म्हणाले की दररोज सुमारे 18 लाख चाचण्या घेतल्या जात आहेत.
लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण झाले कमी
नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीच्या पहिल्या डोसमुळे मृत्यूदर 82% कमी झाला, तर दुसऱ्या डोसमुळे 95% मृत्यू रोखले जाऊ शकले.
लोकांना मास्क घालण्याचे आवाहन
लव्ह अग्रवाल म्हणाले की बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जसजसे लोक आपल्या कामावर परतत आहेत, ते मास्कचा वापर कमी करत आहेत. मास्कला आपल्या आयुष्यातील अविभाग्य घटक मानने खूप गरजेचे आहे.
मुलांच्या लसीबद्दल अफवा पसरत आहेत
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की बर्याच माध्यमांतील वृत्तांत असे सांगितले जात आहे की कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे, भारतातील लाखो मुलांना लस डोस मिळणे शक्य झाले नाही, ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. हा अहवाल योग्य नाही.
आरोग्य मंत्रालयाने या गोष्टी सांगितल्या
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.