आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींमुळे झाले प्रभावित:भारताचे पहिले गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांचा भाजप प्रवेश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. अनिल अँटोनी यांच्यानंतर आता सीआर केसवन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश केला. सीआर केसवन हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे पणतू आहेत. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जनरल व्ही. के. सिंग यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी सीआर केसवन म्हणाले की, 'माझा सर्वात मोठ्या राजकीय पक्ष भाजपमध्ये औपचारिकपणे समावेश केल्याबद्दल मी जनरल व्हीके सिंह यांचे आभार मानतो.' यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानले आहेत.

डिजिटल इंडियाचे केले कौतुक

भाजपमध्ये प्रवेश करताना सीआर केसवन म्हणाले की, जग जेव्हा कोविड-19च्या संकटाशी झुंजत होते, तेव्हा पंतप्रधानांनी नि:स्वार्थी कोविड योद्ध्यांच्या मदतीने चेहऱ्यावर हसतमुखाने ते आव्हान स्वीकारले. पंतप्रधान मोदींची लोककेंद्रित धोरणे, सुधारणांवर आधारित सर्वसमावेशक विकासामुळे भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यांनी 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले. मी माझ्या कुटुंबातील लोकांना ओळखतो, ज्यांना पीएम आवास योजनेत घरे देण्यात आली आहेत, यासोबतच त्यांनी डिजिटल इंडियाचे कौतुक केले आणि डिजिटल परिवर्तन अतुलनीय असल्याचे सांगितले. गरिबांचे फायदे पूर्वी मध्यस्थांकडून लुटले जात होते, ते आता थांबले आहे.

23 फेब्रुवारी रोजी दिला राजीनामा

काँग्रेसचे सदस्य असलेल्या सीआर केसवन यांनी 23 फेब्रुवारीला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पक्षावर स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. सीआर केसवन म्हणाले होते की, त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ समर्पित भावनेने केलेल्या कामाची पक्षाने कदर केली नाही, त्यामुळेच त्यांना हे पाऊल उचलावे लागले. केशवन यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते की, कोणत्याही विरोधी राजकीय पक्षाकडे एक चांगली व्याख्या आणि लोकांसाठी संदेश असायला हवा. त्यांनी आदर्शपणे लोककेंद्रित मुद्दे उचलले पाहिजेत. पण दुर्दैवाने, कालांतराने माझ्या लक्षात आले की, काँग्रेस पक्षाची वृत्ती आणि दृष्टिकोन क्वचितच ठोस आणि सुसंगत राहिला आहे.