आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीचा दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसची लस आतापर्यंत शोधली गेली नाही, तरीदेखील देशातील लॉकडाउन शिथील करण्यात आले आहे. यातच अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. हा कोरोनाचा धोका लक्षात घेता 12 वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत पाठवले जाऊ नये, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
प्रियांका तिब्रेवाल नावाच्या एका वकील महिलेने 12 वर्षांखालच्या मुलांनी कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत जाऊ नये यासाठी कोलकाता उच्च न्यायायालयात याचिका दाखल केली आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे मुलांना विषाणूचे संक्रमण होण्याचा जास्त धोका आहे. यामुळेच, मुलांना कोरोनाची लस येईपर्यंत शाळेत पाठवू नये, असे या महिलेचे म्हणने आहे. याबाबत कोलकाता हायकोर्टातल्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याबाबत बाजू मांडण्यास सांगितले आहे.पुढच्या आठवड्यात या प्रकरणी पुढची सुनावणी होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.