आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममध्ये २०२४ ची लाेकसभा निवडणूक लढवण्याची रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची (आठवले गट) याेजना आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा पक्ष आसामात दाेन जागा लढवणार आहे. नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत २ जागांच्या यशानंतर रिपाइने हा निर्णय घेतला आहे.
बारपेटा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची याेजना आहे. हा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. सध्या काँग्रेसचे अब्दुल खालिक या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. बारपेटाव्यतिरिक्त आसामातील आणखी एक जागा रिपाइं लढवेल, असे आठवले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.