आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी धरणं देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने अहंकाराची खुर्ची सोडावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, "अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि खोटे टीव्हीवर भाषण, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आपल्यावर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय आणि अधिकार देऊनच उतरवले जाईल. त्यांच्याशी गैरवर्तन, त्यांच्यावर लाठीमार करून, अश्रुधूर सोडून ते कर्ज उतरवले जाणार नाही. जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार द्या" अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
अन्नदाता सड़कों-मैदानों में धरना दे रहे हैं,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 1, 2020
और
‘झूठ’ टीवी पर भाषण!
किसान की मेहनत का हम सब पर क़र्ज़ है।
ये क़र्ज़ उन्हें न्याय और हक़ देकर ही उतरेगा, न कि उन्हें दुत्कार कर, लाठियाँ मारकर और आंसू गैस चलाकर।
जागिए, अहंकार की कुर्सी से उतरकर सोचिए और किसान का अधिकार दीजिए।
काँग्रेसने सुरु केली #SpeakupForFarmers मोहीम
केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेसने #SpeakupForFarmers ही मोहीम हाती घेतली आहे. ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केला. पहिल्यांचा काळा कायदा आणि आता लाठीमार केला. पण ते विसरले की जेव्हा शेतकरी आवाज उठवतो तेव्हा त्याचा आवाज संपूर्ण देशात घुमतो’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी #SpeakupForFarmers या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मोदी सरकार ने किसान पर अत्याचार किए- पहले काले क़ानून फिर चलाए डंडे लेकिन वो भूल गए कि जब किसान आवाज़ उठाता है तो उसकी आवाज़ पूरे देश में गूंजती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 30, 2020
किसान भाई-बहनों के साथ हो रहे शोषण के ख़िलाफ़ आप भी #SpeakUpForFarmers campaign के माध्यम से जुड़िए। pic.twitter.com/tJ8bry6QWi
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.