आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला ३५ दिवस झाले आहेत. बुधवारी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात महिलांसह अनेक जखमी झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि डाव्या पक्षांच्या गांधी मैदान ते राजभवनपर्यंत काढण्यात आलेल्या किसान मार्चला रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, शेकडोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांनी पोलिसांचे ऐकले नाही. यानंतर पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांच्या लाठीमारामुळे चेंगराचेंगरी झाली.
चर्चेआधी शेतकऱ्यांची कठोर भूमिका :
संयुक्त किसान माेर्चाने सरकारसोबत चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, कठोर भूमिका कायम आहे. सहाव्या टप्प्यातील चर्चा चार मुद्द्यांवर केंद्रित असेल, असे माेर्चाने सरकारला पत्र पाठवून म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.