आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farooq Abdullah On Central Government; National Conference Chief | Narendra Modi Government | Farooq Abdullah

24 कोटी मुस्लिमांना चीनमध्ये पाठवणार का?:फारुख अब्दुल्ला यांचा केंद्राला सवाल, म्हणाले- धार्मिक रेषा ओढून देशाचे विभाजन करू नका

श्रीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्दुल्ला म्हणाले की, सरकार धार्मिक रेषा ओढून देशाचे विभाजन करत आहे. भीती आणि द्वेषाचे राजकारण देशात नवीन नाही. हे थांबवले पाहिजे. - Divya Marathi
अब्दुल्ला म्हणाले की, सरकार धार्मिक रेषा ओढून देशाचे विभाजन करत आहे. भीती आणि द्वेषाचे राजकारण देशात नवीन नाही. हे थांबवले पाहिजे.

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अब्दुल्ला म्हणाले की, सरकार धार्मिक रेषा ओढून देशाचे विभाजन करत आहे. हे थांबवले पाहिजे. भीती आणि द्वेषाचे राजकारण देशात नवीन नाही. हे लोक 22-24 कोटी मुस्लिमांचे काय करणार? त्यांना समुद्रात फेकणार की चीनला पाठवणार?

अब्दुल्ला म्हणाले की, गांधीजी रामराज्याबद्दल बोलायचे, ज्याचा अर्थ एक कल्याणकारी राज्य होता, जिथे सर्व लोकांना समान संधी मिळेल आणि कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. आपण सर्वांनी गांधीजींच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे. समुदायांना एकमेकांच्या विरोधात उभे केले जाऊ नये. अब्दुल्ला यांनी शनिवारी त्यांच्या घरी डझनहून अधिक पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते.

अब्दुल्ला यांनी शनिवारी त्यांच्या घरी डझनहून अधिक पक्षांची बैठक घेतली.
अब्दुल्ला यांनी शनिवारी त्यांच्या घरी डझनहून अधिक पक्षांची बैठक घेतली.

निवडणूक आयोगाला भेटून जम्मू-काश्मीरमध्ये लवकर निवडणुकांची मागणी करणार

बैठकीनंतर अब्दुल्ला म्हणाले की, आज जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सने मालमत्ता कराच्या विरोधात बंद पुकारला होता, राज्यात तरुणांवर लाठीचार्ज केला जात आहे. यावरून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चांगली नसल्याचे दिसून येते. जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून त्यांना दोन केंद्रशासित प्रदेश बनवणे ही संपूर्ण देशाची शोकांतिका आहे. जम्मू-काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही या देशाचे आहोत, मग आमच्यासोबत असे का केले जात आहे? आम्ही देशद्रोही नाही.

दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांच्याकडे मागणी करू की, येथे निवडणुका वेळेपूर्वी व्हाव्यात आणि जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. राष्ट्रीय विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही भेटणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...