आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जींदजवळील कंडेलामध्ये सुरू असलेल्या महापंचायतीत अपघात झाला. ज्या व्यासपीठावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत शेतकऱ्यांना संबोधित करत होते, ते व्यासपीठ अचानक कोसळले. यावेळी मंचावर राकेश टिकैतसह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
#WATCH | The stage on which Bharatiya Kisan Union (Arajnaitik) leader Rakesh Tikait & other farmer leaders were standing, collapses in Jind, Haryana.
— ANI (@ANI) February 3, 2021
A 'Mahapanchayat' is underway in Jind. pic.twitter.com/rBwbfo0Mm1
राकेश टिकैत त्यांच्या भाषणासाठी मोठी गर्दी
अपघातापुर्वी महापंचायतीला संबोधित करताना राकेश टिकैत म्हणाले की, सरकारची घेराबंदी एक नमुना आहे. येणाऱ्या काळात अशाप्रकारेच गरीबाच्या अन्नावर घेराबंदी होईल. अन्न तिजोरीत बंद होऊ नये, यासाठीच हे आंदोलन सुरू झाले आहे. सध्या सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. पुढील परिस्थिती पाहून शेतकरी दिशा ठरवतील. स्वतःवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याबद्दल टीकैत म्हणाले की, 'आंदोलन सुरू असेपर्यंत आंदोलन करेल, नंतर तुरुंगात जाईल.'
मीडियाकडून लाल किल्यासंबंधी प्रश्न विचारल्यावर टीकैत म्हणाले की, हा सर्व सरकारचा कट होता. आम्ही मागील 35 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करत आहोत. आम्ही कधीच लाल किल्यावर जाण्याबाबत विधान केले नाही. 26 जानेवारीला लाल किल्यावर गेलेले शेतकरी नव्हते, ते सर्व सरकारने रचलेला कट होता.
कंडेलामध्ये झालेल्या महापंचायतीत 5 प्रस्ताव ठरले
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.