आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीट पीजी-२०२१ मध्ये काउन्सेलिंगच्या विशेष राउंडची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत निकाल राखून ठेवला. न्या.एम.आर.शहा आणि न्या.अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने म्हटले की, नीट पीजीमध्ये दीड वर्षानंतरच्या प्रवेशामुळे केवळ याचिकाकर्त्यांचे शिक्षण नव्हे तर लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रक्रियेला मर्यादा असली पाहिजे. काउन्सेलिंगच्या ८-९ फेरीनंतरही जागा रिक्त राहिल्यास काउन्सेलिंग संपल्यानंतर विद्यार्थी असा दावा करू शकत नाहीत की, त्यांना रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. यामुळे शिक्षणासोबत लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.