आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्दामपणा:इम्रान पाहुण्यांना चहा-पाणीही विचारत नाही, पाहुण्यासमोर खाल्ल्यावर देतात ढेकर; याच उद्धटपणामुळेच गेली सत्ता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर 2022 मध्ये एके दिवशी, पाकिस्तानी पत्रकार अतिका ​​रहमान संध्याकाळी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोरच्या घरात बसल्या होत्या. 3 नोव्हेंबर रोजी रॅलीवर झालेल्या हल्ल्यानंतर अतिका या ​​इम्रान खान यांची मुलाखत घेत होत्या. खान त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, 'जेव्हा एकामागून एक गोळ्या माझ्या डोक्यावरून गेल्या, तेव्हा पहिला विचार आला की, मला आणखी कुठे दुखापत झाली आहे का?'

या मुलाखतीदरम्यान, इम्रान खान एका माणसाला खोलीत बोलावतात आणि त्याला कॉफी आणायला सांगतात. काही वेळाने त्यांच्यासाठी एका ट्रेवर कॉफी येते. अतिकाच्या प्रश्नांची उत्तरे देताना खान कॉफी पित असतात... याच्या सुमारे 4 महिन्यांनंतर, अतिका '​​द प्रॉस्पेक्ट' या मासिकातील एका लेखात लिहितात की, 'ज्या देशात गरीबातील गरीब लोक पाहुण्याला चहा-पाणी विचारतात, त्या देशात इम्रान खान यांनी मला साधी कॉफी देखील विचारली नाही.

आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून अटक करण्यात आली आहे. या बातमीत आपण पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार अतिका ​​रहमान यांच्या मुलाखतीतून समजून घेणार आहोत की, इम्रान त्यांच्या जिद्दी आणि उद्दामपणामुळे सत्तेबाहेर आहेत का? लष्कराचा ड्रीम बॉय बनून इम्रान सत्तेवर कसे आले आणि मग सत्तेतून बाहेर कसे फेकले गेले.

इम्रान खानला मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली.
इम्रान खानला मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली.

पत्रकाराचा दावा : इम्रान खानला अंडे कसे उकळायचे हे देखील माहित नाही

द प्रॉस्पेक्टमध्ये अतिका ​​लिहितात की, 'इमरान खान यांनी आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. त्यांचे पहिले लग्न 1995 मध्ये ब्रिटनच्या जेमिमा गोल्डस्मिथशी झाले होते. इम्रानच्या एका मित्राने मला सांगितले की, 'इम्रान जेमिमासोबत होता तेव्हा त्यांच्या घरी पाहुण्यांची काळजी घेतली जायची, जेमिमा स्वतः ते सांभाळत होती. पण इम्रान, यांना तर अंडे कसे उकळायचे हे देखील माहित नाही. ते कोणाला पाण्याचा ग्लासही उेत नाही, ही त्यांची पद्धतच आहे.'

आतिका पुढे म्हणते की, 'इम्रान खानच्या या सवयींबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी 2013 मध्ये जेव्हा मी त्यांची मुलाखत घेतली होती, तेव्हा माझ्यासमोर बसलेल्या खान यांनी पुरी खात, ढेकर देत संपूर्ण नाश्ता संपवला, पण मला पाणीही विचारले नाही.'

अतिकाप्रमाणेच इम्रान खानच्या व्यक्तिमत्त्वावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांनी त्यांना अहंकारी म्हटले आहे. 2018 मध्ये जेव्हा खान पाकिस्तानमध्ये सत्तेवर आले तेव्हा त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणारा भारताचा अंशुमन गायकवाड म्हणाला होता की, इम्रान खान यांना गर्व आहे, ते इतर लोकांपेक्षा स्वत:ला वेगळे समजतात. ते पाकिस्तान संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळे दिसतात.'

द स्टेट्समनमध्ये, पाकिस्तानी मुत्सद्दी मलीहा लोधी यांनी 2022 मध्ये इम्रान खानच्या सरकारच्या पतनाला त्यांच्या अहंकाराला दोषी ठरवले आहे. त्या लिहितात की, 'इम्रान सत्तेवर आले तेव्हा त्यांना लष्कराचा पूर्ण पाठिंबा होता, त्यांची प्रतिमा जनमानसात चांगली होती, त्यांच्या पक्षाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पंजाब राज्यात ताकद होती. यानंतरही ते आपल्या कामात अपयशी ठरले.'

मलिहा लिहितात की, '2018 च्या निवडणुकीत इम्रानच्या पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यांनी आघाडी करून सरकार स्थापन केले. आघाडी सरकार चालवण्यासाठी नम्रता आणि तडजोड आवश्यक आहे. इम्रान यांच्याकडे ती अजिबात नाही.'

पाकिस्तानी पत्रकार मुर्तझा अली शाह यांचाही असेच वाटते. इंडिपेंडंट या इंग्रजी वेबसाइटमध्ये मुर्तझा यांनी खान यांची सत्ता गमावण्यामागे दोन कारणे सांगितली आहेत. प्रथम - अहंकार आणि दुसरा - अक्षमता. मुर्तझा लिहितात की, सत्तेवर आल्यानंतर इम्रानने सर्वप्रथम आपल्या टीकाकारांना तुरुंगात टाकण्यास सुरुवात केली. अनेक पत्रकारांचे काम बंद पाडले. इम्रान टीका अजिबात सहन करू शकत नाही हे स्पष्ट आहे.

इम्रानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने आरोप केला आहे की, रेंजर्सनी इम्रान आणि त्यांच्या वकिलालाही मारहाण केली. त्यांच्या वकिलाला रक्तबंबाळ केले, त्याचा व्हिडिओही पक्षाने शेअर केला आहे.
इम्रानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने आरोप केला आहे की, रेंजर्सनी इम्रान आणि त्यांच्या वकिलालाही मारहाण केली. त्यांच्या वकिलाला रक्तबंबाळ केले, त्याचा व्हिडिओही पक्षाने शेअर केला आहे.

लष्कराला खूश करून इम्रान झाले पंतप्रधान

अतिका ​​लिहितात की, 'पाकिस्तान तिथल्या लोकांद्वारे चालवले जात नाही तर सेना प्रमुख देश चालवतात. काही लष्करी अधिकारी पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये फेरफार करतात. ते सरकार बनवतात आणि फोडतात. ते पाकिस्तानचे आण्विक आणि परराष्ट्र धोरण देखील ठरवतात.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सत्तेत राहण्यासाठी एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे लष्कराला खूश ठेवणे. इम्रान आता लष्करावर आरोप करतील, पण तेही हे काम करूनच पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत.

2018 च्या सुमारास पाकिस्तानचे सैन्य पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग पार्टी या दोन प्रमुख राजकीय पक्षांना पर्याय शोधत होते. जे घराणेशाहीच्या पलीकडे आहे. वास्तविक, पीपीपीवर भुट्टो कुटुंबाचे आणि पीएमएल पक्षावर शरीफ कुटुंबाचे नियंत्रण आहे.

त्यामुळे त्यांच्यावर नीट नियंत्रण ठेवणे लष्कराला शक्य झाले नाही. लष्कराला देशाच्या सत्तेसाठी प्रसिद्ध व्यक्ती आणायची होती. त्यानंतर सेनेला खान यांच्यात अशी व्यक्ती दिसली जी दोन्ही पक्षांना सत्तेतून घालवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकेल.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना खान यांच्याकडे हे सर्व गुण होते. त्याने 1992 मध्ये क्रिकेट वेड असलेल्या देशात विश्वचषक जिंकला होता, ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतले होते आणि त्यांची जगभरात ओळख झाली होती. इम्रान खान लाहोरमधील रुग्णालये आणि विद्यापीठांना निधी देत ​​होते. 1996 मध्ये त्यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. ज्यावरून खान यांना राजकारणात रस असल्याचे सिद्ध झाले.

पाकिस्तानबद्दलची त्यांची दृष्टी आणि इस्लामबद्दलचे त्यांचे मत यामुळे लष्कराच्या नजरेत खान यांची प्रतिमा आणखी मजबूत झाली. खान उर्दू आणि इंग्रजीत भाषणे देत आणि लोकांना पाकिस्तानला महान बनवण्याचे स्वप्न दाखवायचे. पाकिस्तानचे राजकीय समालोचक सिरिल आल्मेडा यांच्या मते, सलग 20 वर्षे लष्कराने पाकिस्तानच्या जनतेच्या मनात दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांविरुद्ध द्वेषाची भावना निर्माण केली.

इम्राला छोटा भागीदार म्हणून ठेवायची लष्कराची इच्छा

पाकिस्तानच्या लोकांमध्ये आपला दबदबा असल्याचा दावा करणाऱ्या इम्रान यांनी नेहमीच आपल्या सत्तेत येण्यामागे लष्कराचा हात असल्याचे नाकारले आहे.

2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या प्रमुख मुद्द्यांवर स्वत: काम करण्यास सुरूवात केली. सिरिल आल्मेडा यांनी स्पष्ट केले की, प्रथमच सत्तेवर येऊनही इम्रान पंतप्रधान म्हणून अधिक सोयीस्कर होत होते.

तीन वर्षे सैन्यात काम केल्यानंतर, त्यांना लष्कराने कनिष्ठ भागीदार म्हणून पुढे चालू ठेवायचे होते. इम्रानच्या अनेक निर्णयांमध्ये लष्कराला बाजूला करण्याचा प्रयत्न दिसून आला. 2019 मध्ये, इम्रानने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ वाढवू नये म्हणून खूप प्रयत्न केले, तरीही ते यशस्वी झाले नाहीत.

तसेच इम्रानने बाजवा यांचे आवडते जनरल नदीम अंजुम यांची पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यास विलंब केला आणि जाणीवपूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न केला. इम्रानने आयएसआय प्रमुख फैज हमीद यांना पेशावर येथे कोअर कमांडर म्हणून पाठवले, जेणेकरून बाजवा निवृत्त झाल्यावर त्यांची जागा लष्करप्रमुख म्हणून ते घेऊ शकतील.

त्याचबरोबर इम्रान खान देश सांभाळण्याच्या मुद्द्यावरही अपयशी ठरताना दिसले. खान सत्तेवर आल्यावर पाकिस्तानसमोरील सर्वात मोठी समस्या होती ती सतत कमी होत चाललेला परकीय गंगाजळीचा. दरम्यान, खान यांनी IMF कडून कर्ज घेण्याची कल्पना साफ नाकारली.

त्यांनी आयएमएफकडून कर्ज घेण्याची तुलना गुलामगिरीशी केली. ते म्हणाले होते की, मी मरेल, पण IMF कडून कर्ज घेणार नाही. मात्र, 9 महिन्यांनंतरच त्यांना आयएमएफकडून कर्जाचा पहिला हप्ता मिळाला. इम्रान सत्तेत आल्यानंतर, 2018 मध्ये पाकिस्तानचा GDP 315 अब्ज डॉलर होता, जो 2022 मध्ये घसरून 264 अब्ज डॉलर झाला.

महागाईने सर्व विक्रम मोडीत काढले. फेब्रुवारी 2022 मध्ये घाऊक महागाई 12.2% आणि घाऊक महागाई 23.6% वर पोहोचली. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, इम्रान खान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार वाढला. 2021 मध्ये सर्वाधिक भ्रष्ट 180 देशांच्या यादीत ते 140 व्या स्थानावर पोहोचले. यामध्ये जगातील सर्वात भ्रष्ट देशाचा 180 वा क्रमांक आहे. 2018 मध्ये पाकिस्तानचे रँकिंग 117, 2019 मध्ये 120 आणि 2020 मध्ये 124 होते.

अभिमानामुळे इम्रान केवळ राजकारणातच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही अपयशी

एक खेळाडू म्हणून इम्रानची प्रतिमा प्लेबॉय सारखी होती. 1995 मध्ये, वयाच्या 43 व्या वर्षी, त्यांनी 21 वर्षीय जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये इम्रानने पत्रकार रेहम खानशी लग्न केले, हे लग्न देखील फक्त 1 वर्ष टिकले.

तीन लग्ने करणारा इमरान म्हणाले, मला लग्न करायचे नव्हते

बुशरा बीबी ही इम्रानची तिसरी पत्नी आहे, जी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अत्यंत परंपरावादी कुटुंबातून आहे. बुशरा पाकिस्तानात सुफी संत म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांना पिरनी देखील म्हटले जाते. ही पदवी संतांना दिली जाते. 48 वर्षीय बुशरा बद्दल असे म्हटले जाते की त्या प्रार्थनेने वाईट आत्म्यांमुळे त्रासलेल्या लोकांना बरे करतात.

त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये बसून अतिकाने इम्रानला बुशरा बीबीबद्दल विचारले? इम्रानने प्रथम या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. अतिकाने इम्रानला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा प्रश्न केला. यावर इम्रान लाजला आणि म्हणाला, "आता मी विवाहित आहे... अजून काय बोलू."

सोप्या शब्दात सांगायचे तर, मी आयुष्याचा जोडीदार असण्यावर कधीच विश्वास ठेवला नाही, पण आता मला असे वाटते की मला जीवनसाथी आहे. मला लग्न करायचे नव्हते कारण मला वाटले की, मी अपयशी ठरेल. त्यावेळेस जेव्हा कोणी माझ्यासमोर लाइफ पार्टनर बद्दल बोलायचे तेव्हा मला वाटायचे की माझ्याकडेही अशी व्यक्ती असेल का? मी अशी भाग्यवान व्यक्ती बनू शकेन का?'

प्रेमाबद्दल बोलत असताना इम्रान यांनी नेल्सन मंडेला यांच्या भेटीची कहाणी आतिकाला सांगितली होती. त्यांनी सांगितले की, 'एकदा मला आणि माझी पहिली पत्नी जेमिमा यांना नेल्सन मंडेला यांनी रेल्वे प्रवासात निधी गोळा करण्यासाठी बोलावले होते. तिथे मला मंडेला त्यांच्या पत्नीसोबत बसलेले दिसले. या दोघांमधील केमिस्ट्री उत्तम होती. मग मी विचार केला की मला पण सोलमेट असेल का? पण आता मी म्हणू शकतो की हो मलाही एक सोलमेट आहे.'