आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, भारताने वेळेपूर्वीच म्हणजे पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २०१४ पूर्वी भारतात फक्त १.५ इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात होते, यावरून ही कामगिरी किती मोठी आहे याचा अंदाज येऊ शकेल. इथेनॉल ब्लेंडिंग १०% पर्यंत पोहोचल्याने तीन मोठे फायदे झाले आहेत. पहिला देशात २७ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाले. दुसरे भारताची ४१,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलनाची बचत झाली. तिसरे म्हणजे गेल्या आठ वर्षांत शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.