आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाब आणि हरियाणामध्ये गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी आंदोलन पेटलेले दिसत आहे. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी नुकतेच भाष्य केले होते. भारतातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काळजी व्यक्त केली होती. भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे ते म्हणाले होते. आता यावर भारताने आक्षेप घेतला आहे.
याविषयावर भारताने त्रुडो यांना सुनावले आहे. 'कॅनडामधील लोकप्रतिनिधींना या संदर्भात पुरेशी माहिती नाही. तसेच यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही. असेही भारताने असल्याचे वृत्त आहे. नुकत्याच पास झालेल्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. यामुळे शेतकरी आंदोलन प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले आहे.
कॅनडाने नेहमीच शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिला असल्याचे त्रुडो म्हणाले होते. तसेच आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली असल्याचेही त्रुडो म्हणाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.