आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही : ६० वर्षांवरील सर्वात जास्त आनंदी, ३६ ते ४५ चे सर्वात दु:खी
नवी दिल्ली - देशातील निम्म्याहून जास्त लोक ते आनंदी असल्याचे मानतात. ५२% लोकांनुसार, आयुष्यासाठी प्रत्येक आवश्यक वस्तू माझ्याकडे आहे. हॅपी+ कन्सल्टन्सीच्या २८ राज्यांत २०,०७३ लोकांचे मत आजमावण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष निघाले आहेत. त्यानुसार, ७७% लोक जे काम करत आहेत, ते तसेच करू इच्छितात. ६४% लोकांचे ध्येय निश्चित आहे. ६७% लोक रोज उद्दिष्टपूर्तीकडे सरकत आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ सर्वात समाधानी व आनंदी, तर ३६ ते ४५ वयाचे सर्वाधिक दबावात असल्याचे समोर आले.
महिलांचा आनंद पुरुषांपेक्षा जास्त;१८ खालील मुलांचे आयुष्य मजेत
हॅपिनेस इंडेक्स : तामिळनाडू, सोशल सपोर्ट: लडाख,
उत्तराखंड अव्वल.
रँक राज्य
1 हिमाचल
2 पंजाब
3 उत्तराखंड
4 चंदीगड
6 दिल्ली
16 हरियाणा
17 गुजरात
21 प. बंगाल 26 छत्तीसगड 27 राजस्थान 28 झारखंड 34 बिहार 35 मध्य प्रदेश 36 यूपी
देश: ८८% म्हणाले, अडचणीत लोक त्यांच्या मदतीस येतील
हॅपी+च्या सर्वेक्षणानुसार, देशाचा स्कोअर ६.८४ आहे. ८७.८ टक्क्यांना वाटते की, अडचणीत लोक त्यांना मदत करतील. ८३.१% म्हणाले, त्यांना काम निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ४३.२% म्हणाले, सरकार व व्यवसायात भ्रष्टाचार आहे. ७०.५% लोकांच्या आयुष्यात आनंद, विनोद व आनंदाची अनुभूती आहे. ३२.९% असे आहेत, कधीतरी वा रोज चिंता, दु:ख व रागाशी सामना होतो. आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य पुरुषांना जास्त आहे.
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-२०२२ : भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये १३९ वर होता. फिनलंड सलग पाचव्यांदा सर्वात आनंदी
४२% लोकांना तणाव जाणवतो, कोरोना हे त्याचे सर्वात मोठे कारण
७०% भारतीयांना कधी कधी, नेहमी वा रोज टेन्शन मिळते. ४२% बऱ्याचदा तणावात राहतात. याचे ५ मोठी कारणे- कोरोनावरून अनिश्चितता, आरोग्य, आर्थिक स्थिती, कुटुंब-मित्र, कार्यस्थळाचा दबाव.
२% लोक असे आहेत, जे कधी तणाव घेत नाहीत. ९% रोज तणाव सोसतात. १३% कधी कधी तणावात असतात.
सरकारी नोकरी करणारे खासगी जॉब करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त समाधानी. बेरोजगार सर्वात दु:खी.
सरकारी नोकरी करणाऱ्यांना सोशल सपोर्ट सर्वात जास्त मिळतो. बेराेजगारांना सर्वात कमी मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.