आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu And Kashmir's Doda 21 Houses Cracked Like Joshimath | Condition Worsened Due To Subsidence, Indian Geological Survey Filed

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये 21 घरांना तडे:जमीन खचल्याने स्थिती बिघडली, भारतीय भूवैज्ञानिक तपासणीसाठी दाखल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या जोशीमठासारखी आपत्ती जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. जम्मूच्या डोडामध्ये जमीन खचल्याने 21 घरांना तडे गेले आहेत. माहिती मिळताच ठाथरीचे SDM यांनी आपत्तीग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी नेले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे पथकही घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोहोचले आहे.

डोडाचे जिल्हादंडाधिकारी अथर अमीन यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील काही घरांना तडे गेल्याची नोंद आहे. गुरुवारपर्यंत आणखी सहा इमारतींना भेगा पडल्या आहेत. ते वाढत आहे. याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. या भागाला तडे जात आहेत.

5 छायाचित्रांमध्ये पाहा डोडाची अवस्था...

हा फोटो डोडा जिल्ह्यातील एका घराचा आहे. येथे भेगा पडल्याने परिसरातील लोक घाबरले आहेत.
हा फोटो डोडा जिल्ह्यातील एका घराचा आहे. येथे भेगा पडल्याने परिसरातील लोक घाबरले आहेत.
डोडा जिल्ह्यात इमारतींसह रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत.
डोडा जिल्ह्यात इमारतींसह रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये डोडा येथील एका घराला तडे गेल्याची नोंद झाली होती. 2 फेब्रुवारी रोजी येथील 6 इमारतींना तडे गेले.
डिसेंबर 2022 मध्ये डोडा येथील एका घराला तडे गेल्याची नोंद झाली होती. 2 फेब्रुवारी रोजी येथील 6 इमारतींना तडे गेले.
3 फेब्रुवारीपर्यंत डोडोच्या 21 घरांमध्ये भेगा दिसून आल्या.
3 फेब्रुवारीपर्यंत डोडोच्या 21 घरांमध्ये भेगा दिसून आल्या.
या इमारती रिकामी केल्या जात आहेत, येथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
या इमारती रिकामी केल्या जात आहेत, येथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

जोशीमठमध्ये काय-काय घडलं...
27 डिसेंबर
: जोशीमठच्या घरांना तडे गेल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर प्रशासनाने अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या 5 सदस्यीय पथकाद्वारे तड्यांची तपासणी केली. यानंतर जोशीमठच्या घरांचे तडे वाढतच गेले, परिस्थिती चिघळली तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने त्याची दखल घेतली.

6 जानेवारी: सुमारे 500 घरे आणि इमारतींना तडे गेल्याने भीती वाढली. बाधित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम वेगाने करण्यात आले.

7 जानेवारी: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जोशीमठला पोहोचले. दरम्यान, चमोलीचे डीएम हिमांशू खुराना यांनी सांगितले की, ही समस्या काही भागातच आहे. नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

8 जानेवारी : जोशीमठ येथील परिस्थितीबाबत पंतप्रधान कार्यालयाने (PMO) उच्चस्तरीय बैठक घेतली. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्यास सांगण्यात आले आहे. या मुद्द्यावर पीएम मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री धामी यांच्याशी चर्चा केली.

9 जानेवारी: जोशीमठच्या इमारतींच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी केंद्राचे एक पथक आले. या पथकाने तपास करून अहवाल राज्य सरकारला सादर केला. 478 घरे आणि 2 हॉटेल्स डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आली. त्याच वेळी, उत्तराखंड सरकारने जोशीमठचे तीन झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला. 9 जानेवारीपर्यंत 81 कुटुंबे विस्थापित झाली.

10 जानेवारी : स्थानिक लोकांच्या विरोधानंतर जोशीमठमधील दोन हॉटेल पाडण्याचे काम थांबवण्यात आले. आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले. यासोबतच नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

11 जानेवारी : जोशीमठमधील 723 घरांना तडे दिसू लागले. सीएम धामी यांनी जोशीमठमध्ये पीडितांची भेट घेऊन दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली. शिफ्टिंगसाठी 50,000 रुपये आणि नुकसान भरपाईसाठी एक लाख रुपये अॅडव्हान्स दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अंतिम नुकसान भरपाई किती असेल, ते नंतर ठरवले जाईल.

12 जानेवारी: जोशीमठमध्ये आणखी 50 हून अधिक घरांमध्ये तडे दिसले, यापूर्वी हा आकडा 723 होता. नुकसान भरपाई निश्चित केल्याशिवाय ते आपली मालमत्ता कशी देऊ शकतात, असे लोकांनी सांगितले. सीएम धामी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संध्याकाळपर्यंत बाधितांच्या खात्यात दीड लाख रुपये पोहोचतील, असे ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये आणखी 5 ठिकाणे 'जोशीमठ' होण्याच्या उंबरठ्यावर, जमीन धसली-घरांना तडे

बसंती आजी यांचे वय 80 वर्षे आहे. वृद्धापकाळ पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह होतो. मालमत्तेच्या नावावर एक गोष्ट आहे, स्वतःचे घर. भिंतींना तडे गेले आहेत, घर कधी कोसळेल याचा भरवसा नाही. बसंती आजी विचारते - 'माझ्या पुढे-मागे कोणी नाही. पेन्शनमधून दोन भाकरी खाव्या की हे घर दुरुस्त करावे. तुम्हीच सांगा या वयात घर सोडून कुठे जाऊ?' सविस्तर वाचा...

बातम्या आणखी आहेत...