आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'My Grandmother Was Killed, My Father Was Killed, I Know More About Terrorism Than The Prime Minister' Rahul Gandhi

कर्नाटक निवडणूक:‘माझ्या आजीला मारले, माझ्या वडिलांना मारले, मला पंतप्रधानांपेक्षा दहशतवाद जास्त कळतो’ - राहुल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांनी आज कर्नाटकात सभांना करत आहेत. यामध्ये ते आई सोनिया गांधी यांच्यासोबत सभा घेणार आहेत.   - Divya Marathi
राहुल गांधी यांनी आज कर्नाटकात सभांना करत आहेत. यामध्ये ते आई सोनिया गांधी यांच्यासोबत सभा घेणार आहेत.  

कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी आज तीन जाहीर सभांना संबोधित करत आहेत. बेळगावीतील पहिल्या सभेला संबोधित करताना राहुल यांनी दहशतवादावर भाष्य करत माझ्यापेक्षा दहशतवाद कोणीही समजू शकत नाही, असे सांगितले.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचे स्मरण करून राहुल म्हणाले की, ‘माझ्या कुटुंबातील अनेक लोकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. अशा परिस्थितीत दहशतवाद म्हणजे काय आणि तो काय करतो, हे मला पंतप्रधानांपेक्षा जास्त समजते.’

राहुल गांधींच्या बेळगाव येथील भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे...

मी दहशतवादाचा बळी आहे, मला ते अधिक समजते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत काँग्रेसवर टीका केली होती की, ‘हा पक्ष दहशतवाद्यांना पाठिंबा देतो.’ ज्याला आज उत्तर देताना राहुल म्हणाले की, ‘आमचे पंतप्रधान दहशतवादावर बोलतात, मला त्यांच्यापेक्षा दहशतवाद चांगला समजतो. दहशतवाद्यांनी माझ्या कुटुंबीयांची हत्या केली, माझ्या आजीला मारले, माझ्या वडिलांची हत्या केली. मला चांगले समजते की दहशतवाद काय आहे.’

राहुल गांधी यांनी बेळगाव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले.
राहुल गांधी यांनी बेळगाव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले.

पंतप्रधान भ्रष्टाचारावर बोलत नाहीत

राहुल गांधी यांनी बेळगाव येथील प्रचारसभेत बोलताना मागील भाजप सरकारवर भाष्य केले. राहुल म्हणाले की, ‘गेल्या 3 वर्षात भाजपने कर्नाटकात चोरीचा विक्रम मोडला आहे. पंतप्रधान कर्नाटकात येतात, पण भ्रष्टाचारावर एक शब्दही बोलत नाहीत.’

प्रत्येक पदवीधराला दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपये

बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘आज देशात 40 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. कर्नाटकातील तरुणही या बेरोजगारीने हैराण झाले आहेत. आम्ही वचन देतो की, सरकार आल्यावर प्रत्येक पदवीधराला दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपये, तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातील.’

कर्नाटकात तीन दिवसांनी निवडणूक प्रचार संपणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने अनेक सभांचे आयोजन केले आहे.
कर्नाटकात तीन दिवसांनी निवडणूक प्रचार संपणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने अनेक सभांचे आयोजन केले आहे.

राहुल यांनी महागाईबाबत विचारला प्रश्न

इतकेच नाही तर राहुल यांनी पंतप्रधानांना महागाईवर प्रश्न विचारले- ते म्हणाले की, ‘पूर्वी गॅस सिलिंडर 400 रुपयांचा होता, आता 1100 रुपयांचा झाला आहे. पंतप्रधान महोदय, तुम्ही याबाबत काय केले? पेट्रोल 60 रुपये होते, ते 100 रुपये झाले, तुम्ही त्याचे काय केले? बेरोजगारी दूर करण्यासाठी तुम्ही काय केले?’