आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Salaam Aarti; PM Modi BJP Govt Vs Tipu Sultan Old Ritual | Karnataka News

कर्नाटकातील मंदिरांमध्ये आता सलाम नाही संध्या आरती:टिपू सुलतानचा 300 वर्षे जुना नियम बदलला; हिंदू संघटनांच्या मागणीनुसार निर्णय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील काही मंदिरातील सलाम आरतीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ती संध्या आरती म्हणून ओळखली जाईल. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. टिपू सुलतानच्या नावाने केले जाणारे विधी रद्द करण्याची मागणी या संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. यात सलाम आरतीचा समावेश होता.

हिंदू मंदिरांवर देखरेख करणारे राज्य प्राधिकरण मुझराई यांनी शनिवारी सहा महिन्यांच्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 18व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू याने या मंदिरांना दिलेल्या भेटीदरम्यान आरतीला नाव दिले होते, असे मानले जाते.

आधी संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या
मेलकोटे येथे ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिर आहे. जिथे हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीपासून रोज संध्याकाळी 7 वाजता सलाम आरती होत आहे. विद्वान आणि कर्नाटक धार्मिक परिषदेचे सदस्य, कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी त्याचे नाव बदलण्याची मागणी केली. भट म्हणाले होते की, सलाम हा शब्द टिपूने दिला होता, lतो आमचा नाही.

भट यांच्या मते, कुक्के श्री सुब्रह्मण्य मंदिर, पुत्तूर येथील श्री महालिंगेश्वर मंदिर, कोल्लूर येथील मुकांबिका मंदिर आणि इतर काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये सलाम आरती होते. मंड्या जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभाग (मुजरई) यांना सादर केला होता.

आदेश सर्व मंदिरांना लागू होईल
हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभाग (मुझराई) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. अधिकृत आदेशानंतर केवळ मेलकोटमध्येच नव्हे तर कर्नाटकातील सर्व मंदिरांमध्ये आरती सेवांचे नाव बदलले जाईल.

मुझराईच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ही फारसी नावे बदलून मंगला आरती नमस्कार किंवा आरती नमस्कार यांसारखी पारंपारिक संस्कृत नावे कायम ठेवण्याचे प्रस्ताव आणि मागण्या होत्या. इतिहास पाहता, पूर्वी जे प्रचलित होते ते आम्ही परत आणले आहे.

विश्व हिंदू परिषदेनेही मागणी केली
यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने कोल्लूर मंदिर अधिकाऱ्यांना सुधारणेसाठी जाण्याचे आणि विधी "प्रदोष पूजा" म्हणण्याचे आवाहन केले होते. मात्र, मंदिराच्या अभिलेखात कुठेही संध्याकाळच्या आरती ‘सलाम मंगलआरती’चे नाव नसल्याचे मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

1990 च्या सरकारी शाळांमध्ये टिपू सुलतान यांचा देशभक्त राजा म्हणून उल्लेख होता. परंतु, 1990 मध्ये मंदिर आणि मशीद असे वाद सुरू झाले. त्यावेळी राजकारणात जातीय तेढ चव्हाट्यावर आणली गेली. त्याच दरम्यान टिपू सुलतान यांची प्रतिमा एका धर्मनिरपेक्षा शासकावरून मुस्लिम तानाशहा अशी बनवण्यात आली.
1990 च्या सरकारी शाळांमध्ये टिपू सुलतान यांचा देशभक्त राजा म्हणून उल्लेख होता. परंतु, 1990 मध्ये मंदिर आणि मशीद असे वाद सुरू झाले. त्यावेळी राजकारणात जातीय तेढ चव्हाट्यावर आणली गेली. त्याच दरम्यान टिपू सुलतान यांची प्रतिमा एका धर्मनिरपेक्षा शासकावरून मुस्लिम तानाशहा अशी बनवण्यात आली.

कोण होते टिपू सुलतान?

20 नोव्हेंबर 1750 या रोजी कर्नाटकच्या देवनाहल्लीत म्हैसूरचे शासक हैदर अली खान यांच्या घरात एका मुलाने जन्म घेतला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव सुल्तान फतेह अली खान शाहाब असे ठेवले. यानंतर त्याच मुलाला पुढे जाऊन टिपू सुलतान या नावाने ओळखले जाऊ लागले.

हैदर अली यांच्या मृत्यूनंतर मुलगा टीपू सुलतान यांना 1761 मध्ये म्हैसूरचा शासक म्हणून विराजमान करण्यात आले. कितीही वाद असले तरीही टिपू सुलतान एक चांगले शासक आणि योद्धा होते असेच सांगितले जाते. BBC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कर्नाटकचे डॉक्टर चिदानंद मूर्ती यांनी टिपू सुलतानला चानाक्ष शासक म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...