आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारधाम यात्रा:केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडणार; यात्रेसाठी आतापर्यंत 9.68 लाख भाविकांची नोंदणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता उत्तराखंडची चारधाम यात्रा सुरू होण्यासाठी अवघे 16 दिवस उरले आहेत.   - Divya Marathi
आता उत्तराखंडची चारधाम यात्रा सुरू होण्यासाठी अवघे 16 दिवस उरले आहेत.  

उत्तराखंडचे मुख्य हिंदू तीर्थक्षेत्र केदारनाथ धामचे कपाट म्हणजेच दरवाजे 25 एप्रिल रोजी उघडले जाणार आहेत. यावेळी 22 एप्रिलपासून उत्तराखंडची चार धाम यात्रा सुरू होत आहे. यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे 22 एप्रिलला आणि बद्रीनाथचे दरवाजे 27 एप्रिलला उघडतील.

यात्रेसाठी पहिल्यांदाच उत्तराखंड सरकारने बुकिंग केले होते. यात्रेसाठी आतापर्यंत एकूण 9 लाख 68 हजार 951 जणांनी नोंदणी केली आहे. आणि 16 फेब्रुवारीपासून GMVN गेस्ट हाऊससाठी 7 कोटी रुपयांहून अधिकची आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे.

ट्रेकिंगसोबतच यात्रेकरूंना हेलिकॉप्टरनेही मंदिरापर्यंत पोहोचता येणार असल्याचे उत्तराखंड पर्यटन विभागाने सांगितले. यासाठी उत्तराखंड सरकारने IRCTC सोबत करार केला आहे.

मंगळवारी उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला आणि एसपी अर्पण जादुवंशी यांनी उत्तरकाशी ते गंगोत्री या यात्रा मार्गावरील तयारीचा आढावा घेतला.
मंगळवारी उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला आणि एसपी अर्पण जादुवंशी यांनी उत्तरकाशी ते गंगोत्री या यात्रा मार्गावरील तयारीचा आढावा घेतला.

प्रवासाच्या मार्गावर आरोग्य एटीएम

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकतेच सांगितले होते की, चारधाम यात्रेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी यात्रा मार्गावर आरोग्य एटीएम बसवले जातील. त्यामुळे भाविकांना खूप मदत होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे.

3 एप्रिल रोजी, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी आढावा बैठकीत सांगितले की, गरज भासल्यास बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि विमानतळासह सार्वजनिक ठिकाणी कोविड लसीकरण शिबिरे देखील सुरू केली जातील.

हा व्हिडिओ 1 एप्रिलचा आहे, ज्यामध्ये बद्रीनाथ धाममध्ये हिमवर्षाव होताना दिसत आहे.
हा व्हिडिओ 1 एप्रिलचा आहे, ज्यामध्ये बद्रीनाथ धाममध्ये हिमवर्षाव होताना दिसत आहे.

सीएम धामी यांनी यात्रा मार्गावर डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य सुविधा तैनात करण्यासाठी 15 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

जोशीमठ बचाव संघर्ष समितीचा इशारा- बद्रीनाथ यात्रेला पहिल्या दिवशी परवानगी दिली जाणार नाही

जोशीमठ बचाव संघर्ष समितीने चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वीच सरकारला इशारा दिला आहे. जोशीमठमध्ये सुरू असलेला एनटीपीसी प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी समितीने केली आहे. सरकारने तसे न केल्यास यात्रेदरम्यान बद्रीनाथ रस्त्यावर समिती चक्काजाम करेल. समितीने 3000 बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे, तर सरकारने केवळ 300 कुटुंबांची ओळख पटवली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी 3 एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली.
मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी 3 एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली.

दुसरीकडे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांनी भूस्खलनग्रस्त जोशीमठसाठी सुमारे 2943 कोटींचे आर्थिक पॅकेज मागितले आहे. यावेळी त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ धामच्या विकासकामांची माहिती देताना मानसखंड मंदिर माला मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात कुमाऊंतील 48 मंदिरांपैकी 16 मंदिरे आणि गुरुद्वारांचा विकास करण्यात आल्याची माहिती दिली.