आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Journalist Siddique Kappan Bail Update | Released Lucknow Jail | Hathras PFI Connection Case

केरळ पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची 28 महिन्यांनंतर सुटका:हाथरस घटनेत हिंसाचार पसरवल्याचा होता आरोप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची आज लखनऊ तुरुंगातून सुटका करण्यात आली. 23 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने EDच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सिद्दीकी कप्पन यांना जामीन मंजूर केला होता. 28 महिने तुरुंगात काढल्यानंतर आज त्यांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडताना व्हिक्ट्री साइन दाखवत ते आपल्या कुटुंबियांना भेटले.

23 डिसेंबर रोजी कप्पन यांना उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ईडीचे विशेष न्यायाधीश संजय शंकर पांडे यांनी कप्पन यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे दोन जामीन आणि तेवढ्याच रकमेच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले होते.

9 जानेवारी रोजी जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती

लखनऊ विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर, गेल्या 9 जानेवारी रोजी कप्पनच्या वतीने जामीन दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने जामीनदारांच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आदेश दिले. बुधवारी जामीनदार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला सोडण्याचे आदेश (रिलीझ ऑर्डर) जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. हवालाकडून पैसे मिळवणे आणि त्याचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर करणे यासह विविध आरोपांवरून चर्चित हाथरस घटनेदरम्यान अटक करण्यात आलेल्या कप्पनवर ईडीने कारवाई केली होती.

हाथरस घटनेत सिद्धिकी कप्पनला अटक करण्यात आली होती

तपासादरम्यान असे आढळून आले की, यूपी पोलिसांनी मसूद अहमद, सिद्दीकी कप्पन, अतीकुर रहमान आणि मोहम्मद आलम यांना 8 ऑक्टोबर 2020 रोजी अहवाल नोंदवून अटक केली होती. जातीय सलोखा बिघडवण्यासाठी, जातीय दंगली भडकवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी ते हातरसला जात होते. आरोपी कप्पन पीएफआयचे मुखपत्र तेजस डेलीमध्ये काम करायचा आणि तो पीएफआयचा सक्रिय सदस्य आहे, तसेच आरोपीची 2014 मध्ये दिल्लीतील दंगलीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

पीएफआय सदस्य केए रौफ आणि इतर पीएफआय सदस्यांना परदेशातून एका षड्यंत्राखाली एक कोटी ३८ लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. रौफ, सईद आणि इतर सदस्य हाथरस येथे जाऊन जातीय सलोखा बिघडवण्यासाठी, दंगली घडवून आणण्यासाठी आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...