आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काँग्रेसने मंगळवारी मथुरेत शेतकरी महापंचायत केली. यात आलेल्या पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारची विवेकबुद्धी मेली आहे. भगवान श्रीकृष्ण यांचा अहंकार तोडतील. यावेळी केंद्र सरकारला टोला लगावताना प्रियंका म्हणाल्या की, तुम्ही गोवर्धन वाचवा, नाहीतर सरकार यालाही विकून टाकेल
शेतकऱ्यांसाठी धरले मौन
आपल्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी प्रियंका गांधींनी भगवान श्री कृष्ण की जय.. असा जयघोष केला. याशिवाय, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन मिनीटांचे मौन धरले. यानंतर प्रियंका म्हणाल्या की, सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती, पण पूर्ण एकही केले नाही. पंतप्रधानांनी स्वतःसाठी दोन विमाने खरेदी केली, पण शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही.
'येणाऱ्या काळात MSP पूर्णपणे बंद होईल'
प्रियंका पुढे म्हणाल्या की, सरकारने श्रीमंतांना अजून श्रीमंत होण्याचे लायसेंस दिले आहे. आता ते साठवण करतील आणि येणाऱ्या काळात MSP पूर्णपणे बंद होईल. पंतप्रधान अहंकारीच नाही, तर भित्रेदेखील आहेत. प्रियंका म्हणाल्या, संसदेत राहुल गांधींनी मृत शेतकऱ्यांसाठी दोन मिनीटांचे मौन धरण्यास सांगितल्यावर एकही भाजप खासदार उभा राहिला नाही.
आमचे सरकार आल्यावर काळा कायदे रद्द करणार
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, भाजप सरकारने फक्त श्रीमंतांचे पोट भरले. जोपर्यंत हे काळा कायदे परत घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू. आमचे सरकार आल्यावर हे काळे कायदे रद्द करू.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.