आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर-खेरी घटनेतील साक्षीदाराच्या भावावर जीवघेणा हल्ला:पीडित म्हणाला- मंत्री टेनी यांचा मुलगा आशिषच्या सांगण्यावरून हल्ला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खेरीमध्ये तिकुनिया प्रकरणाचा मुख्य साक्षीदार प्रभुजोत सिंह यांचा धाकटा भाऊ सर्वजीत सिंह याच्यावर एका मुंडन समारंभात जीवघेणा हल्ला झाला. सर्वजित सिंह यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. तिकुनिया घटनेतील साक्षीदार असलेल्या प्रभुजोतने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रावर आपल्या भावावर खुनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

तिकुनिया घटनेचा मुख्य साक्षीदार प्रभुजोत सिंह
तिकुनिया घटनेचा मुख्य साक्षीदार प्रभुजोत सिंह

शनिवारी तिकुनिया घटनेचा साक्षीदार प्रभूजोत सिंह आपल्या भावासोबत मुंडन समारंभासाठी गेला होता. तेथे उपस्थित असलेल्या विकास चावलाने त्याच्या भावावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामध्ये त्याचा भाऊ सर्वजीत सिंह गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकास चावला हा आशिष मिश्रासोबत काम करायचा, असा दावा प्रभुजोतने केला आहे.

आशिष मिश्रावर खून खटला, 16 डिसेंबरपासून सुनावणी
तिकुनिया हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासह 14 आरोपींवर हत्येचा खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्राच्या आधारे एडीजे कोर्टाने या सर्वांवर आरोप निश्चित केले आहेत. 16 डिसेंबरपासून या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

सर्वजीत सिंह, प्रभुजोत सिंह यांचा भाऊ.
सर्वजीत सिंह, प्रभुजोत सिंह यांचा भाऊ.

या खटल्यातील साक्षीदार प्रभज्योत सिंह सांगतात की, या खटल्याची सुनावणी 16 तारखेपासून सुरू होणार आहे. यामुळे आशिषचा माजी लेखापाल विकास चावला याने त्याच्या सहकाऱ्यासह भावावर दबाव टाकण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. पोलीस-प्रशासन याप्रकरणी कोणतीही कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

3 ऑक्टोबर 2021 रोजी घडली होती तिकुनियाची घटना
3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता, लखीमपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किमी अंतरावर, नेपाळ सीमेजवळ, तिकुनिया गावात शेतकरी आंदोलन करत होते. तेथे अचानक तीन वाहने (थार जीप, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ) शेतकर्‍यांना पायदळी तुडवत पुढे निघून गेली. या घटनेमुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात चार शेतकरी, एक स्थानिक पत्रकार, दोन भाजप कार्यकर्त्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...