आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधीना अयोध्येला निवासाचे आमंत्रण:महंत संजय दास म्हणाले, आमचा हनुमानगढीचा आश्रम त्यांचेच घर, त्यांना हवे तेवढे राहू शकतात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महंत संजय दास आणि काँग्रेस नेते राहुल गांधी.   - Divya Marathi
महंत संजय दास आणि काँग्रेस नेते राहुल गांधी.  

राहुल गांधी यांचे दिल्लीतील शासकीय निवासस्थान रिकामे करण्याच्या नोटीसवरून राजकारण तापले आहे. दरम्यान, अयोध्येचे महंत संजय दास यांनी राहुल गांधींना निमंत्रण पाठवले आहे. राहुल गांधी यांच्याकडे स्वतःचे घर नाही. अशा परिस्थितीत ते आमच्या हनुमानगढीच्या आश्रमात राहू शकतात. आम्ही त्यांचे अयोध्येत स्वागत करु, असे महंत संजय दास म्हणाले. महंत संजय दास हे महंत ग्यानदास यांचे उत्तराधिकारी आहेत, जे राष्ट्रीय संकट मोचन सेनेचे अध्यक्ष आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते.

'येथे सरयू स्नान करून हनुमानगढीला भेट द्यावी'

महंत संजय दास म्हणाले की, ‘राहुल गांधींनी अयोध्येत यावे आणि सरयू नदीत स्नान करून हनुमानगढीचे दर्शन घ्यावे. त्यांना अयोध्येत राहायचे असेल तर संतांचा आश्रम सर्वांसाठी खुला आहे. भाविक ज्या प्रमाणे आमच्या आश्रमात येऊन मुक्काम करतात, तसे त्यांनी सुद्धा राहावे. हनुमानजींचा महिमा सर्वत्र पसरलेला आहे. ते सर्व 8 प्रकारच्या सिद्धी आणि कलियुगातही भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत.’

धर्मसम्राट महंत ग्यानदास त्यांचे शिष्य महंत संजय दास यांच्यासोबत.
धर्मसम्राट महंत ग्यानदास त्यांचे शिष्य महंत संजय दास यांच्यासोबत.

'अडथळे दूर होतील आणि वातावरण अनुकूल होईल'

ते म्हणाले की, ‘राहुल गांधी हनुमानजींच्या आश्रयाला आले तर त्यांचे कल्याण होईल. त्यांच्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे संपतील. त्यांच्यासाठी वातावरण अनुकूल होईल. यात काही शंका नाही.

प्रदेश प्रवक्ते म्हणाले, माझे घरही राहुल यांचेच

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गौरव तिवारी वीरू यांनीही राहुल गांधींना अयोध्येत येण्याचे आणि त्यांच्या रायंगज येथील निवासस्थानी राहण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले, "जिथे रामजींचे घर आहे, तिथे तुमचेही घर आहे. तुम्हाला बेघर केले असेल. पण देवाचे घर सर्वांचे आहे. अयोध्या हे सर्व धर्मांचे समानतेचे शहर आहे. येथे सर्वांना आश्रय मिळतो.’

ते पुढे म्हणाले की, ‘तुम्ही रायपूर महाआधिवासनात म्हटल्याप्रमाणे 52 वर्षांपासून माझ्याकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे मी या देशाचा एक सामान्य नागरिक आणि 25 वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, राम की नगरीमधील या छोट्याशा घ रात मी तुमचे स्वागत करतो. हे घर तुमचेच आहे आणि येथे सरयू माँ देखील आहे.