आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानमधील हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-21 कोसळले. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. वैमानिक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते.
अपघात स्थळावरील पाहा फोटो...
मृतांची नावे...
बाशोकौर रतन सिंग शीख (45), बंटो पलालसिंग राय सिंग (60), लीला देवी राम प्रताप (55) या तीन महिलांचा मृत्यू झाला. पायलट राहुल अरोरा (25) यांनी पॅराशूटने उडी मारून जीव वाचवला. पायलटला त्वरीत सुरतगडला पाठवण्यात आले आहे.
16 महिन्यांत MIG-21 सात वेळा क्रॅश
गेल्यावर्षी बाडमेरमध्ये मिग-21 बायसन कोसळले, 2 पायलट शहीद
28 जुलै 2022 रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-21 बायसन (प्रशिक्षक विमान) क्रॅश झाले होते. त्यात आग लागली आणि सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिघात विमानाचे पार्ट विखुरले गेले होते. या अपघातात विमानातील दोन्ही पायलट शहीद झाले. विमान जेथे पडले तेथे 15 फूट खोल एक मोठ्ठे खडले पडले होते.
5 दशकात 400 अपघात, 200 वैमानिकांना गेला जीव
सोव्हिएत युनियनने 1940 मध्ये मिग विमान बनवले आणि 1959 मध्ये हवाई दलात समाविष्ट केले. मग ते 2,229 किलोमीटर प्रतितास वेगाने म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा 1000 किमी/तास जास्त वेगाने उडू शकते. एप्रिल 1963 मध्ये मिगचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.
1971 आणि 1999 चे युद्ध जिंकण्यात मिगचा महत्त्वाचा वाटा होता. पण भारतात गेल्या पाच दशकात 400 अपघातांमध्ये 200 वैमानिकांनाही जीव गमवावा लागला आहे. 2025 पर्यंत मिग-21 विमाने भारताच्या आकाशातून उतरवली जातील.
मिग-21 चे सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे....
21 मार्च 2002 रोजी संसदेतील लोकलेखा समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हवाई दलातील एकूण अपघातांपैकी 62% अपघात हे मिग विमानांचे झाले आहेत. विविध अहवाल आणि तज्ज्ञांनी या अपघातातील 3 प्रमुख कारणे सांगितली आहेत..
हे ही वाचा
दिव्य मराठी एक्सप्लेनर 13 सेकंदात 2 विमानांची टक्कर : सर्वात मोठा विमान अपघात; मिस कम्युनिकेशनने 586 मृत्यू
27 मार्च 1977 ची घटना आहे. जगातील सर्वात मोठा विमान अपघात स्पेनमधील लॉस रेडिओज विमानतळावर घडला. दोन विमानाची भीषण टक्कर झाली, त्यात 586 जणांना जीव गमवावा लागला. या अपघाताला आज 46 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या विमान अपघाताची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
भारत-पाक युद्धात 'MiG-21' विमानांने गाजवली मर्दुमकी, दिला सर्वोत्कृष्ट हवाई शक्तीचा प्रत्यय
भारतीय हवाई दलाने हे विमान १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणार्या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.