आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NCERT Textbooks| Hindu Extremists’ Dislike For Gandhi, RSS Ban After Assassination

NCERT च्या पुस्तकातून महात्मा गांधींविषयीची माहितीही हटवली:बदल कोणत्याही विचारसरणीच्या दबावाखाली नाही-संचालक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने 12 वीच्या पाठ्यपुस्तकातून महात्मा गांधी, नथुराम गोडसे आणि RSS शी संबंधित मजकूर हटवला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जून 2022 मध्ये NCERT ने एक यादी जारी केली होती, ज्यामध्ये त्यांच्या पुस्तकांमधून काय काढून टाकले जाईल आणि काय जोडले जाईल हे सांगितले होते.

आता NCERT वर आरोप आहे की गांधींबाबतचा आणखी काही मजकूर हटवण्यात आला आहे जो जूनमध्ये जाहीर केलेल्या यादीत नव्हता. नवीन पुस्तके बाजारात आली आहेत. NCERT नुसार, नवीन अभ्यासक्रम 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून लागू केला जात आहे. बदलांनुसार नवीन पुस्तके बाजारात आली आहेत.

हिंदी पुस्तकातून गझल आणि कविताही हटवल्या

NCERT ने हिंदीच्या अभ्यासक्रमातही काही बदल केले आहेत. यातून फिराक गोरखपुरी यांची हिंदी आरोह भाग-2 या पुस्तकातील गझल आणि अंतरा भाग 2 मधील सूर्यकांत त्रिपाठी निराला यांची कविता गीत गाने दो मुझे हे गाणे काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय विष्णू खरे यांचे एक काम और सत्यही हटवण्यात आले आहे.

सेंट्रल इस्लामिक लँड्स प्रकरणही शिकवले जाणार नाही

चालू सत्रापासून होणारे बदल हे केवळ 12वीपर्यंतच मर्यादित नसून इयत्ता 10वी आणि 11वीच्या पुस्तकांमधूनही अनेक प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत. इयत्ता 11वीच्या 'थीम इन वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकातून 'सेंट्रल इस्लामिक लँड्स', 'क्लॅश ऑफ कल्चर्स' आणि 'द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन' यासारखी प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे 10वीच्या लोकशाही राजकारण-2 या पुस्तकातून लोकशाही आणि विविधता, लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी, लोकशाहीची आव्हाने यांसारखी प्रकरणे हटवण्यात आली आहेत.

स्वतंत्र भारतातील राजकारणावरील पुस्तकातून 'जनआंदोलनाचा उदय' आणि 'एकपक्षीय वर्चस्वाचे युग' हटवण्यात आले आहे.

या प्रकरणाशी संबंधित दोन मोठी राजकीय वक्तव्ये

  • NCERTच्या या निर्णयाचे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चोरांना मुघल सल्तनत आणि भारताचा सम्राट असे म्हटले जात होते. या पुस्तकांमधून खोटा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय चांगला आहे.
  • NCERTच्या या निर्णयाचा राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी निषेध केला आहे. पीएम मोदींवर तिरकस टीका करत ते म्हणाले की, आधुनिक भारतीय इतिहासाची सुरुवात 2014 पासून झाली पाहिजे, जेव्हा केंद्रात भाजपची सत्ता आली.

बदल कोणत्याही विचारसरणीच्या दबावाखाली केले नाही: NCERT

NCERTचे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मुले तणावात राहिली. अशा परिस्थितीत पाठ्यपुस्तकांचा भार कमी व्हावा, असे वाटले, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. हे बदल कोणत्याही विचारसरणीच्या दबावाखाली केले नाही असे NCERT ने म्हटले आहे.