आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५५ पेक्षा जास्त झाली आहे. परंतु मद्यपान करून मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने विधिमंडळ तसेच रस्त्यावर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला. नितीशकुमार यांनी मात्र दारू पिणारा मरणारच, असा ठाम पवित्रा घेतला आहे.
त्यातच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने बिहार सरकार व डीजीपीला नोटीस पाठवली आहे. बिहार विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही या मुद्यावरून गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात यावरून वातावरण चांगलेच तापले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.