आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप:माझ्या मोबाइलमध्ये पेगासस, कॉल रेकॉर्डिंग केले जात होते

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल यांच्या दाव्यावर भाजप संतप्त
  • हेरगिरीचा संशय होता तर मोबाइल का तपासला नाही?

ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल म्हणाले, भारतात लोकशाही धोक्यात आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होता. मला गुप्तचर अधिकाऱ्यांनी सल्ला दिला होता की, मी मोबाइलवर काळजीपूर्वक बोलावे. कारण, रेकॉर्डिंग केले जात आहे. त्यांनी सांगितले की, मीडिया आणि न्यायालयांवरही सरकारचे नियंत्रण आहे. लोकशाहीसोबत खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेस नेत्याच्या या आरोपावर भाजप संतप्त झाला आहे. पक्षाचे नेते अनुराग ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले की, हे पेगासस आणखी कुठे नव्हे तर काँग्रेस नेत्याच्या हृदय आणि मेंदूत बसला आहे. त्यांना संशय होता तर मोबाइल का तपासला नाही?

विशेषाधिकार हनन : १४ रोजी भाजप बोलणार
राहुल यांच्याविरुद्ध विशेषाधिकार हनन प्रकरणावर १४ मार्चला प्रिव्हिलेज कमिटीची बैठक होईल. त्यांच्याविरुद्ध भाजप खासदार निशिकांत दुबे प्रिव्हिलेज कमिटीसमोर साक्ष देतील. सूत्रांनुसार, काँग्रेस नेत्याने आधीच आपले लेखी उत्तर समितीला पाठवले आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांवर आरोप केले होते.

बातम्या आणखी आहेत...