आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड काळात संपूर्ण जगात लॉकडाऊनदरम्यान लोकांना आपल्या घरात राहणे भाग पडले. यामुळे त्यांना वेळेबाबतची नव्याने जाणीव झाली. काही लोकांसाठी वेळच समजू शकली नाही तर काहींना तो थांबल्यासारखा वाटला. या काळातील अनुभवांवर ९ देशांतील ३००० लोकांमध्ये पाहणी केली. त्यातील निष्कर्षानुसार, लोक जेवढा वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत राहिले त्यांच्यासाठी वेळ सुखकर राहिला. वेळ निघून गेल्याचे त्यांना कळलेही नाही.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास एकटे राहिल्यावर वेळ जाणे कठिण ठरले. ब्रिटनमध्ये लिव्हरपूल जॉन मूर्स युनिव्हर्सिटीमध्ये मानसोपचार तज्ज्ञ रूथ ओग्डेन म्हणाले, वेळेबाबत लोकांच्या मनात बदल आला आहे. वेळ प्रत्यक्षात धन नव्हे तर ताकद आहे,ही जाणीव लोकांना झाली. एखादा व्यक्ती त्याच्याकडे वेळ नाही,असे म्हणत असेल तर त्याचा अर्थ असतो, वेळ त्याच्या अधिकारात नाही. वास्तवात वेळेवर नियंत्रण असल्यावरच तो आनंदासाठी वापर करू शकतो.
अथेन्समध्ये पेंटियन युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्र अग्रिरो वॅटाकिस यांच्यानुसार, वेळ घालवण्याची काय पद्धत असावी किंवा वेळेसोबत कुण्या व्यक्तीसोबत कसे संबंध असावेत?बहुतांश लोकांसाठी हे विसरणे कठीण असते की, त्यांच्या आयुष्यातील एक ते तीन वर्षांचा वेळ असा होता, ज्यात त्यांचे जीवन आधीपेक्षा एकदम बदलले होते.
वेळ मर्यादित आणि मौल्यवान हा समज तयार “फोर थाउजंड वीक्स : टाइम मॅनेजमेंट फॉर मॉर्टल्स’चे लेखक ओलिव्हर बुर्केमन यांच्या म्हणण्यानुसार, वेळ मर्यादीत आहे आणि खूप मूल्यवान आहे. लॉकडाऊनमध्ये जगभरात लोकांची दिनचर्या बदलली, यामुळे ते स्वत:च्या वेळेची व्याख्या करत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.