आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab Goindwal Jail Murder Case; Punjab Prison System | Gangster Lawrence | Cm Bhagwant Mann | Punjab

गोइंदवालच्या घटनेने पंजाबच्या तुरुंग व्यवस्थेचा पर्दाफाश:ना बॉडी स्कॅनर, ना जॅमर; गुंडांना दक्षिण भारतात हलवण्याचा NIA चा प्लॅन लटकला

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील गोइंदवाल तुरुंगात आधी 2 गुंडांची हत्या आणि नंतर लॉरेन्स टोळीच्या जल्लोष व्हिडिओने सरकारी यंत्रणेचा पर्दाफाश केला आहे. पंजाबमधील तुरुंग विभाग स्वत: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे असून या घटनेतून गुंडांनी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे.

लॉरेन्स टोळीच्या गुंडानी गोइंदवाल कारागृहात गुंडांची हत्या केल्यानंतर काढलेल्या व्हिडिओमध्ये मृतदेहाजवळ पोलिसही दिसत आहेत. म्हणजेच तुरुंग प्रशासनाशी त्यांचे चांगलेच संबंध दिसून येत आहेत.

पंजाबमधील एकाही तुरुंगात ह्यूमन बॉडी स्कॅनर नाही. राज्यातील कोणत्याही तुरुंगात मोबाइल जॅमर नाहीत, जे फोरजी तंत्रज्ञानाने नेटवर्क जॅम करू शकतील. ज्या तुरुंगात जॅमर आहेत तेही खूप जुने आहेत आणि ते फक्त 2G नेटवर्क जॅम करू शकतात. सर्व मोठे गुंड आणि अमली पदार्थांचे तस्कर तुरुंगात बसून आपल्या टोळ्या चालवत आहेत. म्हणजेच तुरुंगांचा ते सुरक्षित घर म्हणून वापर करत आहेत.

NIA ची सूचना- गुंडांना दक्षिण भारतात हलवावे
पंजाबमधील गुंड आणि अंमली पदार्थांच्या तस्करांच्या संगनमताचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 7-8 महिन्यांत पंजाबमधील वेगवेगळ्या तुरुंगांवर 2 ते 3 वेळा छापे टाकले आहेत. या छाप्यांनंतर एनआयएकडून एक सूचना आली होती की, पंजाबच्या तुरुंगात बंद असलेले कुख्यात गुंड आणि अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क तोडण्यासाठी त्यांना दक्षिण भारतातील तुरुंगात हलवावे.

एनआयएचा युक्तिवाद असा होता की, स्थानिक असल्याने गुंडांनी पंजाब पोलिसांचे अधिकारी आणि इतर कर्मचार्‍यांशी मजबूत संबंध निर्माण केले आहेत. मोबाइल फोनपासून ते ड्रग्ज वगैरे कारागृहात सहज उपलब्ध होतात. गुंडांना दक्षिण भारतात हलवल्यास भाषिक समस्यांमुळे त्यांचे नेटवर्क तुटेल. मात्र, एनआयएच्या या सूचनेची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

पंजाब पोलिसांचे गुप्तचर नेटवर्क अपयशी
लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या टोळीने गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली होती. या हत्येचा संपूर्ण कट कारागृहातच रचला गेला. दोन टोळ्यांमध्ये काही काळ खडाजंगी झाली पण पंजाब पोलिसांच्या गुप्तचर नेटवर्कला त्याचा थांगपत्ताही लागला नाही. दोन टोळ्या फुटल्या हेही त्यांना माहीत नव्हते. परिणाम- लॉरेन्स टोळीने 26 फेब्रुवारी 2023 रोजी गोइंदवाल तुरुंगात जग्गू गँगचे दोन सदस्य मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहनाची हत्या केली.

गोइंदवाल तुरुंगात तुफान आणि मोहनाची हत्या केल्यानंतर तुरुंगातील लॉरेन्सच्या टोळ्यांनी कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारला याची माहिती दिली. ब्रारने सोशल मीडियावर या दोन्ही हत्यांची जबाबदारी स्वीकारली. लॉरेन्स टोळीने जेलमध्येच तुफान आणि मोहनाच्या मृतदेहाजवळ व्हिडिओ बनवून जग्गू टोळीला जाहीरपणे धमकावले.

मिनी मोबाइल ते स्मार्ट फोन पर्यंत उपलब्ध
पंजाबच्या तुरुंगात मिनी मोबाइलपासून ते स्मार्टफोनपर्यंतची चलती आहे. गेल्या 8 महिन्यांत कारागृहात बंद असलेल्या कैद्यांकडून 4500 हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लहान चिनी फोन बोटापेक्षा लहान आकाराचे असतात. पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांकडून जप्त करण्यात आलेले 70 टक्के मोबाइल हे केचोडा या विशिष्ट ब्रँडचे मिनी फोन आहेत. या फोनची लांबी 7CM पेक्षा कमी आणि रुंदी 3CM आहे. हे फोन इतके छोटे आहेत की तपासादरम्यान कैदी ते भिंतींच्या आतल्या भेगांमध्ये लपवतात. 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा फोन सर्व ई-कॉमर्स साइटवर उपलब्ध आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कारागृहात मोबाईल फोन आढळल्यास जेल कायद्याच्या कलम 52A (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. हे कलम जामीनपात्र असल्याने आरोपींच्या चौकशीसाठी कस्टडी मिळत नाही.

CRPF आणि बॉडी स्कॅनरची गरज
पंजाबमधील तुरुंगांची सुरक्षा स्थानिक पोलिसांकडे आहे. सीआरपीएफ येथे तैनात नाही. सीआरपीएफच्या उपस्थितीमुळे स्थानिक पोलिसांपर्यंत गुंडांचा प्रवेश बर्‍याच प्रमाणात कमी होतो. सीआरपीएफ जवान कोणत्याही राजकीय दबावाशिवाय कर्तव्य बजावतात.

पंजाबच्या सर्व तुरुंगांमध्ये बॉडी स्कॅनरचीही गरज भासू लागली आहे. कारागृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, लॉकअपमध्ये अनेकदा गुप्तांगात लपवून मोबाईल किंवा इतर मादक पदार्थ कारागृहात आणले जातात. अनेकवेळा हे सामान शोधात सापडत नाही.

अतिसुरक्षा असलेल्या तुरुंगात शस्त्रे कशी पोहोचली?
पंजाबमधील गोइंदवाल तुरुंग हे स्वतःच उच्च सुरक्षा तुरुंग आहे. म्हणजे इथे फक्त कट्टर गुन्हेगार ठेवले जातात. 30 ते 40 जण एकमेकांना भिडले, अशा तुरुंगात शस्त्रे कुठून आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टोळीयुद्धातही रॉडचा वापर झाला आहे. कारागृह प्रशासनाने एका बराकीत 30 ते 40 कैद्यांना ठेवले, त्यामुळे टोळीयुद्ध सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...