आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Speech British Parliament; Rahul Gandhi Attacks On PM Modi | Cambridge University | Congress | Narendra Modi

ब्रिटनमध्ये राहुल गांधीचे भाषण:म्हणाले- मी येथे बोलू शकतो, पण भारतीय संसदेत चीन घुसखोरीचा मुद्दा मांडण्याची परवानगी नाही

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी ब्रिटन आणि चीनचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, भारतीय संसदेत चिनी सैन्याच्या भारतात घुसखोरीचा मुद्दा विरोधकांना मांडण्याची परवानगी नाही.

राहुल गांधी रविवारी लंडनमधील हाऊंस्लो येथे 1500 परदेशी भारतीयांच्या उपस्थितीत संबोधन करत होते. रविवारी इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या इंडिया इनसाइट्स कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की- भारताला चीनपासून सावध राहण्याची गरज आहे. चीन सीमेवर खूप सक्रीय आणि आक्रमक होतांना दिवसेंदिवस दिसून येत आहे.

दुसरीकडे, सोमवारी म्हणजे आज राहुल गांधी ब्रिटिश संसदेत भाषण करणार आहेत. ते आयओसीच्या यूके चॅप्टर अंतर्गत ओव्हरसीज प्रोग्राम आणि प्रीमियर थिंक टँक कार्यक्रमाला संबोधित करतील. 7 मार्चला ते भारतात परतणार आहेत.

भारतीयांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या भाषणातील तीन मोठे मुद्दे वाचा-

1. संसदेत आवाज उठवू न देणे ही अनिवासी भारतीयांसाठी लाजिरवाणी बाब आहे. राहुल गांधी म्हणाले की- भारतातील सरकार विरोधकांना मत मांडायला परवानगी देत नाही. तिथल्या संसदेतही असेच घडते. वस्तुस्थिती अशी आहे की, चीनमधून भारतात मोठी घुसखोरी सुरू आहे. यावर जेव्हा आम्ही संसदेत बसून प्रश्न उपस्थित करतो तेव्हा आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. हे खरोखर लाजिरवाणे आहे.

2. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भारत हा मुक्त विचारांचा देश होता, आता तो नाही. आपला देश अधिक मुक्त विचारांचा आहे. असा देश जिथे आपण आपल्या ज्ञानाकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आता हे सर्व उद्ध्वस्त होऊ लागले आहे. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता.

3. नेता केंब्रिजमध्ये बोलू शकतो पण भारतीय विद्यापीठात नाही. राहुल म्हणाले की, मला हे खूप विचित्र वाटते. एक भारतीय नेता केंब्रिजमध्ये बोलू शकतो. तो हार्वर्डमध्ये बोलू शकतो, पण भारतीय विद्यापीठात तो बोलू शकत नाही. विरोधी पक्षांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर सरकार ते होऊ देत नाही. हा तो भारत नाही, जो आपण पूर्वी ओळखला जात होता.

राहुल यांनी रविवारी लंडनमधील हौंस्लो येथे 1500 परदेशी भारतीयांसमोर भाषण केले.
राहुल यांनी रविवारी लंडनमधील हौंस्लो येथे 1500 परदेशी भारतीयांसमोर भाषण केले.

राहुल म्हणाले - भारताला चीनबाबत सावध राहण्याची गरज

  • 5 मार्च रोजी, केंब्रिजपासून 100 किमी अंतरावर लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या इंडिया इनसाइट्स कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भारताला चीनशी सावध राहण्याची गरज आहे. तो सीमेवर खूप सक्रिय आणि आक्रमक आहे.
  • 7 दिवसांच्या यूके दौऱ्यावर गेलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्या व्यासपीठावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने इंडिया इनसाइट्स अंतर्गत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान राहुल म्हणाले- देशाचा अपमान मी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी करत आहे.
  • राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्लाबोल केला जातो. बीबीसीच्या बाबतीतही तेच झालं. राहुल यांनी आयकर छापे, लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आणि भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले.

महात्मा गांधी आणि गुरु बसवण्णा यांना अभिवादन
भाषण देण्यापूर्वी राहुल गांधी यांनी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे लंडनमधील जुने निवासस्थान असलेल्या आंबेडकर हाउसमध्ये दाखल झाले. त्यांना अभिवादन केले. महात्मा गांधी आणि गुरु बसवण्णा यांच्या पुतळ्यांना देखील अभिवादन केले.

हे ही वाचा सविस्तर

विदेशातून राहुल यांनी मोदी सरकारला 7 वेळा घेरले : BJP म्हणते- बदनामीचे षडयंत्र; जाणून घ्या- राहुल यांचा फायदा काय?

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ला केला जातो. बीबीसीच्या बाबतीतही तेच झालं. माझा फोन टॅप केला जातोय. विरोधकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून हा एक दबाव आहे, ज्याचा सतत सामना करावा लागतो.’ - येथे वाचा संपूर्ण बातमी

मी नाही, मोदींनी देशाचा अवमान केला:राहुल गांधी म्हणाले - सरकारला प्रश्न करणाऱ्यांवर हल्ला होतो, BBC सोबतही हेच झाले

ब्रिटनच्या 7 दिवसीय दौऱ्यावर गेलेल्या खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्या व्यासपीठावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने इंडिया इनसाइट्स अंतर्गत राहुल गांधींशी वार्तालाप केला. यावेळी राहुल म्हणाले - देशाचा अवमान मी नाही, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...