आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या एक अर्ज सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. हा अर्ज एका पतीने आपल्या पत्नीला मनवण्यासाठी वरिंष्ठाकडे मागितलेल्या सुट्टीचा आहे. कानपूरमधील BSA लिपिक शमशाद यांनी त्यांच्या अधिकार्यांना रजेसाठी एक अर्ज केला. त्यात त्यांनी लिहिले की, "पत्नी रागाच्या भरात माहेरी गेली आहे, परत आणण्यासाठी तीन दिवसांची रजा हवी आहे. एक वर्षापासून रजा न मिळाल्याने पत्नीची नाराजी वाढली आहे. शमशादचा रजेचा अर्ज हा त्यांच्या विभागात चर्चेचा विषय राहिला आहे.
शमशाद अहमद यांनी गटशिक्षणाधिकारी प्रेम नगर यांना 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत रजा मंजूर करण्यासंबंधात अर्ज केला. पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खूप दुखावलो आहे. पत्नीची समजूत घालून तिला परत आणण्यासाठी मला गावी जावे लागेल, असे त्यांनी पत्रात म्हटले.
ब्लॉक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
शमशाद बीएसएच्या प्रेम नगर कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. शमशाद म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून त्यांना कोणत्याही प्रकारची रजा मिळालेली नाही. या कारणावरून गेल्या अनेक महिन्यांपासून पत्नीसोबत किरकोळ वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी परिस्थिती आणखी बिघडली. वाद वाढल्याने ते कार्यालयात आले आणि सायंकाळी घरी गेला असता पत्नी तिच्या माहेरी निघून गेली होती. सोबत तिच्या मुलीला आणि दोन्ही मुलांनाही नेले होते.
BSA लिपिकाचे हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शमशाद रुथी आपल्या पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरून परत आणण्यासाठी रजा मागत आहे. त्यांचे सहकारी कर्मचारी या अर्जाची खिल्ली उडवत असले तरी शमशाद म्हणाले की, त्यांनी जे खरे आहे तेच लिहिले आहे.
यापूर्वी बलिया येथील एका हवालदाराने रजेचे अनोखे कारण सांगितले होते. त्या हवालदाराने विभागीय रजिस्टरवर आपल्या व्यथा लिहल्या होत्या. डायल 112 मध्ये तैनात असलेल्या या हवालदाराने 28 जुलै रोजी अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला आहे. कॉन्स्टेबलने त्यात लिहिले की, "माझ्या लग्नाला 7 महिने झाले, अद्याप कोणतीही चांगली बातमी मिळालेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले आहे. दोघांना एकत्र राहावे लागेल. त्यामुळे घरी जावे लागेल. विनंती केली. कृपया मला 15 दिवसांची रजा द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.