आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतीमालाला भाव मिळत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना वडवणी येथे घडली. डिगांबर मुंजाबा वांडरे (५२) या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्याच शेतात वीष प्राषन करून आत्महत्या केली आहे.वांडरे हे अल्पभुधारक असल्याने त्यांच्याकडे खाजगी बॅंक व इतर बॅंकाचे मिळुन चार ते पाच लाखांचे कर्ज होते.ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत या शेतकऱ्याने औषध घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,भाऊ असा मोठा परिवार आहे. अतिवृष्टीचे अनुदान नाही, पिक विमा नाही या सर्व संकटातून शेतकरी मार्ग काढण्यास अपयशी ठरत असून व शासनही शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढीसाठी कुठलाही प्रयत्न करत नाही त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या वाढत आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे यांनी दिला आहे डिगांबर वांडरे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.