आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केंद्राच्या धोरणांविरोधात रॅली काढण्यात आली. खेतीहार मजदूर युनियन, सीटू, अखिल भारतीय किसान महासभा आणि अखिल भारतीय शेतमजूर संघटनेने या रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये एमएसपी हमी कायदा, खासगीकरण थांबवा, कॉर्पोरेट समर्थक धोरणे बंद करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा आदी मागण्या संघटनांनी ठेवल्या.
संघटनेच्या नेत्यांनी म्हटले की, केंद्र सरकार केवळ कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम करत आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संघर्ष यापुढे सुरूच राहील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.