आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्रोकन हॉर्सेस’ने पूर्ण केले स्वप्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधू विनोद चोप्राने ‘ब्रोकन हॉर्सेस’ नावाचा हॉलिवूड चित्रपट बनवून आपले दशकापूर्वीचे स्वप्न पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्यांनी हॉलिवूडच्याच कलावंतांना घेतले आहे. शूटिंग पूर्ण झाले आहे आणि आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनोद हॉलीविडला भेटी देत होते. त्यांच्या आधी अनेकांनी प्रयत्न केला. मात्र ते सगळे चित्रपट मुख्य स्टुडिओजवळ असलेल्या किराणाच्या दुकानावर बनलेले आहेत. मीरा नायर आणि दीपा मेहताच्या चित्रपटात भारताचे कलाकार असतात, मात्र या दोघींना हॉलिवूड दिग्दर्शकाची मान्यता मिळालेली आहे. भारताचे अनेक यशस्वी कलाकार आणि दिग्दर्शक हॉलिवूडमध्ये जाण्याचे स्वप्नच पाहत असतात. एकदा तर मसालामेकर प्रकाश मेहरा कॅसियस क्ले यांना भेटायला गेले होते. त्यांचे मानधन ऐकून मेहरा आपल्या विचारातून बाहेर आले. असो, विधू विनोद चोप्रा यांनी पुणे फिल्म संस्थेत शिक्षण घेत असताना 22 मिनिटांचा एक चित्रपट बनवला होता. त्याला आपल्या श्रेणीत ऑस्कर नामांकनसुद्धा मिळाले होते. त्यावेळी ते सरकारी खर्चावर अमेरिकेला गेले होते.

विधू विनोद चोप्रा यांनी कमी बजेटच्या थ्रिलरपासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. ‘परिंदा’च्या यशानंतर त्यांनी ‘1942 अ लव्ह स्टोरी’ बनवला. राहुलदेव बर्मन यांच्या मधुर संगीतामुळे हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहील. पुण्यातून आलेल्या तरुणांना त्यांनी संधी दिली. संजय लीला भन्साळी यांनासुद्धा ‘1942 अ लव्ह स्टोरी’ मधील गीतांकनाची संधी दिली आणि ‘मिशन कश्मीर’मध्ये राजकुमार हिरानीला सहायक म्हणून घेतले. हिरानीने त्यांच्यासोबत मिळून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘3 इडियट्स’ हे यशस्वी चित्रपट बनवले. या दरम्यान, विधू विनोद चोप्रा यांनी फक्त ‘एकलव्य’चे दिग्दर्शन केले.

खरं तर विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट दृष्टिकोन नेहमीच हॉलिवूडच्या चित्रपटासारखा राहिला. चित्रपटाच्या भारतीय म्हणीचा ते वापर करत नाहीत. त्यांची कला आवडसुद्धा नेहमी पाश्चिमात्य आहे. मात्र चित्रपटाविषयी ते नेहमी समर्पित असतात. भारतीय सादरीकरणात सोपेपणा आणि भावनेचा वेग जास्त दिसून येतो. मात्र हॉलिवूडमध्ये प्रत्येक दृश्याच्या अवचेतनाचे सरळ रूप कधीच शाळेतला शिक्षक सांगतो त्याप्रमाणे सादर केले जाऊ शकत नाही. सर रिचर्ड अँटनबरो यांचा ‘गांधी’ जगभरात यशस्वी झाला आणि त्याने पुरस्कारसुद्धा मिळवले. मात्र भारतात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. भारताच्या अनेक भाषेत या चित्रपटाची डबिंग करण्यात आली. मात्र मसाला चित्रपटाप्रमाणे कमाई झाली नाही. भारतात सर्वात जास्त यश मिळेल, असे दिग्दर्शकाला वाटत होते. मात्र तसे झाले नाही. याची वरवरची कारणे पुरेशी नाहीत. उदा- हे म्हणणे की, प्रदर्शनापर्यंत भारत गांधीवादापासून दूर झाला होता. हे काही ठोस कारण नाही. गांधीजींच्या भूमिकेसाठी विदेशी अभिनेता बेन किंगस्ले यांना घेतल्याचे कारणही पटण्यासारखे नाही. हॉलिवूडचे अ‍ॅक्शन चित्रपट आपल्या येथे यशस्वी राहिले आहेत. जेम्स कॅमरॉन यांच्या ‘टायटॅनिक’ला सुद्धा सर रिचर्ड अँटनबरो यांच्या ‘गांधी’पेक्षा जास्त व्यावसायिक यश भारतात मिळाले. दुसरीकडे अँटनबरो यांच्या ‘गांधी’चा विषय घोर भारतीय होता. मात्र त्याची फिल्मी प्रस्तुती आणि संवेदनशील कलात्मकता विदेशी होती. कदाचित याच कारणामुळे भारतात बनलेले विदेशी चित्रपट, त्यात भारतीय कलाकारसुद्धा असतात. हॉलिवूडमध्ये ऑस्कर मिळवतात. कारण दिग्दर्शकाची संवेदनशील कलात्मकता आणि पद्धत ऑस्कर मतदारांच्या ओळखीची असते.

खरं तर अभिनयाच्या दोन वेगळ्या शाळा आहेत. हॉलिवूडमध्ये ते अंडरप्ले करतात. दृश्याची भावना समजून घेऊन अभिनेत्याच्या चेहर्‍यावर आलेला भाव व्यक्त होण्यासाठी पुरेसा असतो तथापि आपले अभिनेते वेगळे असतात. भाव व्यक्त करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतात. आतून होणारा प्रयत्न आणि प्रयत्न न करणे यात फरक आहे. आपल्या येथेसुद्धा मोतीलाल, संजीव कुमार, ओमपुरी आणि इरफान खान सारखे अभिनेते अभिनयाच्या या शैलीचे राहिले आहेत.

याचप्रमाणे ‘स्लमडॉग मिलियनेअर’सुद्धा भारतीय चित्रपट होता. मात्र सादरीकरणामुळे भारतात त्याला हवे तसे यश मिळाले नाही. ‘अंदाजे बयां’ चे सर्व प्रकरण आहे. असो, ‘स्लमडॉग मिलिनेयर’च्या मूळ कथेत अँकर भारतीय झोपडपट्टीत राहणार्‍या मुलाच्या विरोधात असतो. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अँकर प्रेम करत असतो आणि तो मुलगा तेथे नोकर असतो. कोट्यधीश झाल्यावर तो मुलगा आपल्या प्रेमप्रकरणाविषयी माध्यमांना सांगण्याची भीती अँकरला असते. त्यामुळे अँकर मुलाला अटक करण्याचे सांगतो. मात्र याच प्रकरणामुळे एका लोकप्रिय कलावंताने ही भूमिका केली नव्हती. कारण ही घटना त्याच्या आयुष्याशी निगडित होती. अँकरच्या भूमिकेसाठी दुसर्‍याची निवड झाल्यावर मूळ कथेतून हे प्रकरण काढून टाकण्यात आले. असो, आता विनोदला आपले ध्येय मिळाले आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.