आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : अभिषेक बच्चन डायरेक्टर अनुराग कश्यपच्या 'मनमर्जिया' चित्रपटातून कमबॅक करत आहेत. अभिषेकने नुकताच खुलासा केला की, अभिषेक बच्चनने गेल्या दोन वर्षांपासून अॅक्टर म्हणून कोणतेच काम केले नाही. फिल्म जर्नालिस्ट अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही गोष्ट मान्य केली. यासोबतच त्याने या सर्वांवर ऐश्वर्याची रिअॅक्शन कशी होती हे सांगितले.
काय म्हणाला अभिषेक
अभिषेकने मुलाखतीत सांगितले की, "मला अॅक्टिंग करायची नाही असे मी म्हणत नाही. परंतू मी ज्या प्रकारचे चित्रपट करत आहे, त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. मला योग्य चित्रपट मिळण्यासाठी दोन वर्ष लागले. मी दोन वर्षाच्या ब्रेकविषयी कुटूंबियांना सांगितले होते आणि ते माझ्या या निर्णयाच्या पाठीशी होते. माझी बायकोही माझ्या या निर्णयामागे ठामपणे उभी होती. तिने मला खुप सपोर्ट केला."
वडील म्हणाले 5 वर्षे केली होती प्रतिक्षा
- अभिषेकने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, वडीलांनी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी एक चांगला चित्रपट मिळण्यासाटी 5 वर्षे प्रतिक्षा केली होती. अमिताभ बच्चन यांनी '7 हिंदुस्तानी' (1969) मधून डेब्यू केला होता. तर 1973 मध्ये त्यांना 'जंजीर' या चित्रपटातून यश मिळाले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अभिषेक संदर्भात अजून काही गोष्टी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.