आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strange But Horrible Facts About Salt Makers Of Gujarat

PICS: मिठातच जन्मतात आणि मरतातही हजारो कामगार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरजबारी- कच्छच्या मिठागरामध्ये कष्ट करणार्‍या आगरी समाजाकडून देशातील 75 टक्के मीठ उत्पादन केले जाते. या ठिकाणी काम केल्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होत असतो. त्याचे हात-पाय काडीसारखे कडक होऊन जातात. एवढेच नव्हे तर पाय एवढे कठीण होतात की, मृत कामागारांचे अंत्यविधीत पाय जळतही नाहीत. अंत्यविधीनंतर नातेवाईक पायाचे अवशेष गोळा करून खड्डय़ात मीठ घालून त्यांना ते पुरावे लागतात, असे येथील कामगारांनी सांगितले.

अहमदाबादपासून 150 कि.मी. अंतरावरील सूरजबारी खाडी परिसरात आगरी समाज अनेक वर्षांपासून येथे काम करत आहेत. येथील जमिनीतील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा दहापट खारे आहे. बोअरमधून काढलेले पाणी 25 बाय 25 मीटरच्या शेतात पसरवले जाते. सूर्य उगवल्यानंतर त्याचे चमकदार मिठात रूपांतर होते.