मुंबई - कॉमेडी अभिनेता सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भांडणानंतर अली असगर, सुगंधा मिश्रा. चंदन प्रभाकर यांनी हा शो सोडला होता. शोमध्ये दादीची भूमिका करणारा अभिनेता अली असगरने यावेळी प्रथमच शो सोडल्याचे कारण सांगितले आहे. यावेळी त्याने सांगितले की, तो कपिल शर्मा शो मिस करत आहे. यासाठी सोडला द कपिल शर्मा शो..
- अलीने सांगितले की, मी अजिबात नाकारु शकत नाही की शोमधील दादीच्या भूमिकेने मला लोकप्रियता मिळाली. पण आमच्यात काही मतभेद होते हेसुद्धा तितकेच खरे आहे.
- त्यावेळी मला निर्णय घ्यायचा होता आणि माझ्या करिअरच्या दृष्टीने मी तो घेतलाही
- माझी भूमिका एकाजागी थांबून गेली होती जिथे अजून काही वाव आहे असे मला वाटत नव्हते. पण जे घडले ते दुर्दैवी आहे हे खरे.
- पुढच्या स्लाईडवर वाचा, आगामी प्रोजोक्टसबद्दल काय म्हटला अली..