बच्चन यांनी गुजरात सरकारची जाहिरात करताना ‘नवरात्र बिना गुजरात कहां, गुजरात बिना नवरात्र कहां’ असा संवाद म्हटला होता. त्यांच्या या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार रश्मी या महिलेने केली आहे. त्यांचे म्हणणे असे होते की, देशाच्या विविध भागांत नवरात्रोत्सव भक्तिभावनेने साजरा होतो. परंतु बच्चन यांच्या जाहिरातीमुळे इतर भागांतील नवरात्र उत्सव कमी लेखला जातो. यामुळे
आपल्या भावना दुखावल्याची त्यांची तक्रार आहे.