राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या हाय-प्रोफेशनल लग्नाचे आमंत्रण डिझायनर मनीष मल्होत्रालाच देण्यात आले नाही. त्यामुळे तो नाजार झाला आहे. कारण तो राणीचा चांगला मित्र आहे.
या लग्नात त्याचा प्रतिस्पर्धी डिझायनर सब्यसाची मुखर्जीला आमंत्रित करण्यात आले होते. या गोष्टीचे मनीषला सर्वात जास्त वाईट वाटले आहे.
त्याच्या संबंधीत एका सुत्राच्या सांगण्यानुसार, डिझायनरने राणीचा मेकओव्हर करून तिला बॉलिवूडमध्ये स्थान देण्यास मदत केली. परंतु राणीने त्यालाच आपल्या लग्नापासून दूर ठेवले.
दुसरीकडे, सब्यसाचीच्या प्रति राणीची वागणून सर्वांनाच माहित आहे. दोघे बंगाली असल्याने त्यांचे चांगले पटते.
एवढेच नाही तर, सब्याने या लग्न सोहळ्यात राणी आणि आदित्य यांच्यासाठी काही कपडेसुध्दा डिझायइन केले होते.