आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या अनेक योजनांपैकी एक असणाऱ्या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्यांना स्वस्त दरात विमानसेवा पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत अनेक शहरात विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. यात अनेक लहान शहरांचाही समावेश आहे. तेथे विमानतळ उभारुन विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. चार एप्रिल रोजी या अंतर्गत पठाणकोट विमानतळावर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. विमान उड्डाण मंत्रालयाने उडान अंतर्गत रिजन कनेक्टिव्हिटी स्कीमचे (आरसीएस) रूट्स फायनल करण्यात आले. कोणत्या शहरातील उड्डाणे कुठपर्यंत जातील याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या शहरांसाठी उड्डाणे
अलाहाबाद येथून मुंबई, पुणे, रायपूरसाठी इंडिगो तर नागपूर आणि पाटणासाठी जेट एअरवेज उड्डाण भरेल. हिंडन येथून हुबळी, कन्नूर, ओझर (नाशिक) साठी विमानसेवा सुरु होणार आहे.
पुढे वाचा: आणखी कोणत्या शहरांमध्ये सुरु होणार विमानसेवा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.