महाराष्ट्रातील राजकारणाचा विषय असला, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख येतोच. त्याचे कारणही तसेच आहे. गेल्या काही दशकांपासून पवारांनी राज्याच्या राजकारणात कायम किंगमेकरची भूमिका बजावलेली आहे. पवार सत्तेत असो किंवा नसो त्यांची भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला समाधानकारक जागा मिळू शकल्या नाहीत. तरीही मुरब्बी राजकारण्याप्रमाणे पवारांनी भाजप आणि शिवसेनेला खेळवत ठेवले. याचे सर्व क्रेडिट केवळ पवारांना जाते. देशाचा पंतप्रधान होण्याची कुवत असलेला, पण संधी न मिळालेला हा नेता आजही भल्याभल्यांना चीतपट करु शकतो हे नवोदितांसाठी राजकारणाचे एक आदर्श उदाहरण आहे. जाणून घेऊयात... शरद पवार यांनी कशी केली परिस्थितीवर मात... विरोधकांना कसे पाजले पाणी...
यशवंतराव चव्हाण हे पवारांचे राजकीय गुरु समजले जातात. 1967 मध्ये शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. 1978 मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर जनता पक्षासोबत आघाडी करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. एवढ्या कमी वयात तेही कॉंग्रेसची सोबत न घेता राज्याच्या सर्वोच्च स्थानावर ते विराजमान झाले होते. देशातील राजकारणात शरद पवार निश्चितच एक मोठी भूमिका बजावतील हे यावेळीच सिद्ध झाले.
इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर हे सरकार बरखास्त करण्यात आले. 1980 च्या सुमारास ते इंडियन नॅशनल कॉंग्रेस (सोशलिस्ट) या पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर लोकसभेवर निवडून गेले. पण त्यांना राज्याच्या राजकारणात रमायचे होते. बारामती मतदारसंघातून ते राज्यात स्थायीक झाले.
तेव्हापासून शरद पवार महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक प्रमुख नाव झाले आहे.
त्यांच्या भूमिकेशिवाय राज्यातील राजकारणाचे पानही हलत नाही हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर आता पवार संपले असे सांगितले जात होते. पण पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना करुन सोनियांना त्यांच्यासोबत आघाडी करण्यास भाग पाडले. शिवाय कमी खासदार असतानाही केंद्रात कृषिमंत्र्यासारखे महत्त्वाचे खाते मिळवले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या. तरीही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांना सत्तेपासून रोखून धरण्यात पवार यशस्वी झाले आहेत. महायुतीत मिठाचा खडा टाकून सत्ता समिकरणे पार बदलून टाकली आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, या निवडणुकीत शरद पवार यांनी कशी घेतली फिनिक्स भरारी... पक्षाला कमी जागा मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना कशी केली आव्हानांवर मात... कसा सिद्ध केला राजकीय मुरब्बीपणा...