(प्रतिकात्मक छायाचित्र.)
भारताने उत्तर कोरियाला कोरियन द्विपकल्पावर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.तसेच अणुकार्यक्रम बंद करण्याचे सांगितले आहे.उत्तर कोरियाकडून पाकिस्तानला अणुवस्त्रे मिळण्याची शक्यता असल्याने भारताची चिंता वाढली आहे.उत्तर कोरियाचा परराष्ट्र मंत्री प्रथमच भारताच्या दौ-यावर आले आहेत.हा देश भारताला
आपल्या गटात सामील करुन घेण्याच्या प्रयत्नात आहे. कारण अणुवस्त्र मिसाइल्सच्या चाचण्यांमुळे पाश्चात्त्य देशांनी कोरियावर आर्थिक निर्बंध लादले आहे.पंतप्रधान
नरेंद्र मोदी पुढील महिन्यात या देशाच्या दौ-यावर जाणार आहेत.
उत्तर कोरियाचे लक्ष्य 2016
द इन्स्टीट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सेक्युरिटी या संस्थेच्या माहितीनुसार 2013 पर्यंत उत्तर कोरियाजवळ प्लुटोनियम आणि युरेनियमा व्यतिरिक्त 12 ते 27 अणु शस्त्रास्त्रे आहेत. 2016 पर्यंत 14 ते 48 पर्यंत त्यांची संख्या न्यायची असल्याचे कळते. दुसरीकडे 2012मध्ये फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या अंदाजानुसार उत्तर कोरियाकडे 10 अणुशस्त्रे असल्याचे सांगितले.
पुढे वाचा, जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे उत्तर कोरिया...