त्याचबरोबर आरीफने असे सांगितले की, त्याच्याकडून ज्याप्रकारचे काम करून घेतले जात होते, त्याने तो समाधानी नव्हता. पण चौकशीत मात्र त्याच्या परतण्याचा उद्देश वेगळाच असल्याचे लक्षात येत आहे. एका खास उद्देशाने भारतात परतला असल्याचे तो मान्य करत आहे. आरीफने सांगितले की, 28 नोव्हेंबरला त्याला चार जणांनी इस्तानबूल विमानतळाजवळ सोडले होते. त्याला 2 हजार डॉलरही दिले होते. त्यावेळी त्याने वडिलांना फोन करून परतत असल्याची माहिती दिली. आरीफच्या वडिलांना एनआयएला त्याच्या परतण्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला इस्तानबूलहून भारतात परत आणण्यात आले आणि बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
सहा महिने युद्धात सहभागीआरिफने सांगितले की, ISIS साठी तो सहा महिने युद्धात सहभागी झाला होता. मोसूल बंधा-यावर ताबा मिळवण्यासाठी ISIS ने जो हल्ला केला होता, त्यात तो सहभागी झाला होता. तसेच
इराकमध्ये भैजी आणि तालअफर तेल शुद्धीकरण संयंत्रावर केलेल्या हल्ल्यातही तो सहभागी होता. आरीफने तपास संस्थांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, सारियाच्या लष्कराचे दोन माजी अधिकारी अबू अनास आणि अबू मरियम हेही ISIS मध्ये सहभागी आहेत.
पुढे तो म्हणाला की, ISIS मध्ये भारतीय वंशाचे चार ब्रिटीशही सहभागी झाले आहेत. पण भारतातून मात्र त्याच्या आणि कल्याणच्या तिघांशिवाय कोणीही सहभागी नव्हते. आरीफने ISIS ने बंदी बनवलेल्या 39 मजुरांबाबत माहिती देण्यासही नकार दिला आहे.
(फाइल फोटो-ISIS मध्ये सहभागी झालेला आरीफ मजीद)