आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article On Mumbai Pune Mumbai 2 Movie

शुभमंगल सावधान...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळशीचं लग्न
दोन-तीन दिवसांवर आलंय,
मग आपल्याकडे
लग्नाची धूम सुरू होणारेय.

ज्या मुलामुलींची लग्नं ठरलीयेत
त्यांच्या मनात धाकधूक असणारेय,
आपला निर्णय बरोबर आहे ना?
माणसं मिठासारखी नसतात, जी कायम खारटच राहतील. गौतमने व्यक्त केलेली ही अनिश्चितता जाणूनच निर्णय घ्यायला हवा.

‘मी ज्याच्यासोबत एक दिवस काढला नि प्रेमात पडले, तो गौतम आणि आताचा लग्न ठरल्यानंतरचा गौतम वेगळा आहे. तो खूप बदललाय. लग्नानंतरही तो बदलत राहिला तर मी काय करू? एकदा लग्न झालं की मी मागे नाही वळू शकणार, मग आताच घाई कशाला?’
"मुंबई पुणे मुंबई २'मधल्या गौरीची ही अवस्था आपल्यापैकी बहुतेकांना ओळखीची आहे. प्रेमात पडून लग्न करा किंवा आईवडिलांनी ठरवून, निर्णय योग्य आहे ना, नंतर आपण निभावून नेऊ शकू ना, नीट होईल ना सगळं, तो/ती बदलणार तर नाही लग्नानंतर, असे असंख्य प्रश्न असतातच सर्वांसमोर. प्रश्न वर्षानुवर्षं आहेत, आता ते बाहेर पडू लागलेत. विशेषत: मुलींच्या तोंडून. मुलाकडच्यांनी बैठकीच्या वेळी हुंडा मागितला म्हणून लग्न मोडणाऱ्या मुली आणि "जब वी मेट'मधल्या गीतसारखं "जैसे कोई ट्रेन छूट रही है' असं वाटणाऱ्या मुली. साखरपुड्यानंतर लग्न मोडणाऱ्या मुली किंवा लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मला हे जमणार नाही, असं म्हणत "लव्ह आज कल'मधल्या दीपिकासारख्या माहेरी निघून येणाऱ्या मुली. स्वत:चा आतला आवाज ऐकून निर्णय घेणाऱ्या अशा मुली आजकाल आजूबाजूला जरा अधिकच दिसू लागल्यात, असं वाटतंय का तुम्हालाही?

मग, ‘शुभमंगल सावधान’ ऐकताच बोहल्यावरून पळून जाण्याबद्दल जे आपल्याला ऐकून माहीत आहेत, त्या समर्थ रामदासांचं काय? ते तर शेकडो वर्षांपूर्वीचे ना. का त्यांना ‘सावधान’ हा शब्द इतकं सावध करून गेला की, ते थेट पळूनच गेले?

म्हणजे लग्नापूर्वीची ही अनिश्चितता, संसाराचा खेळ मांडण्यापूर्वीच तो सोडून जाण्याची तयारी शतकानुशतकांपासूनची आहे. आज केवळ शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अन‌् आईवडिलांच्या विश्वासास पात्र असणाऱ्या मुलींमुळे ती व्यक्त होतेय. आपण करतोय ते चूक की बरोबर, ही शंका इतरही अनेक प्रसंगी आपल्या मनात असते. नोकरी किंवा घर बदलताना, शिक्षणासाठी प्रवेश घेताना. एवढंच काय, कपडे, गाडी, दागिने खरेदी करतानाही डोक्यात येतंच, हे घेऊ की ते? मग लग्नासारखा महत्त्वाचा, आयुष्यभरासाठीचा, दोन जीव नव्हे तर दोन कुटंुबं जोडणारा निर्णय घेताना पोटात बाकबूक तर होणारच ना?

एकदा लग्न झालं की, होता होईतो ते टिकवायचं, मोडायचं नाही. डोलीत बसून आत यायचं ते तिरडीवरच बाहेर पडायचं, असं अगदी आता उरलं नसलं तरी अजूनही घटस्फोटाकडे भुवया उंचावूनच बघितलं जातं. घटस्फोट होणं म्हणजे गुन्हा आहे, अपराध आहे, असाच समज आजही दिसून येतो. घटस्फोिटत महिलेकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं, हा या लेखाचा विषय नव्हे. परंतु, तेही लग्न टिकवून ठेवण्यामागचं, सहन करण्यामागचं, तडजोड करत राहण्यामागचं मोठं कारण असतं, हे नाकारून चालणार नाही.

म्हणजे शेकडो माणसं यात संबंधित असतात, त्यांच्यात हे नवराबायको गुंतलेले असतात. किंवा, या नवराबायकोत या सर्व आप्तेष्टांचा जीव गुंतलेला असतो. त्यामुळेही लग्न मोडणं कठीण होत असतं.

म्हणून आजवर मुली गप्प बसत आल्या. साखरपुड्याच्या वेळची एखादी घटना, एखादा महत्त्वाचा प्रसंग विसरणं, वेळ न पाळणं, शब्द न पाळणं, खोटं बोलणं, फसवणं या किंवा अशाच कारणांमुळे अनेकदा मुलींना, किंबहुना मुलांनाही, लग्नाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावासा वाटत असतो. परंतु, आता सगळी तयारी झालीय, पत्रिका वाटल्यात, पाहुणे आलेत, खरेदी झालीय वगैरे कारणांमुळे तो प्रत्यक्षात आणला जात नाही.

लोक काय म्हणतील, आपली छी-थू होईल, याचा सामािजक दबाव तर असतोच प्रचंड.
पण म्हणून अनिश्चितता नसते, असं मानणं चुकीचं ठरेल. ती अत्यंत साहजिक आहे.
मुलीसाठी - कारण ती आपलं घर सोडून दुसरीकडे जाणार असते, अनेक अर्थांनी तिचं आयुष्य बदलणार असतं.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उर्वरित लेख....