आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाैरंगाबाद- राज्यात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी नव्याने याेजना अाणि माेहिमा राबवण्याची क्रीडा मंत्री विनाेद तावडे यांच्याकडून नुसतीच वल्गना ठरत अाहे. याचाच प्रत्यय त्यांनी गत वर्षी केलेल्या घाेषणेतून सहजरीत्या येताे. त्यांनी २३ अाॅक्टाेबर २०१७ राेजी अाता महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारांनाही शिव छत्रपती पुरस्काराने यंंदापासून गाैरवण्यात येईल,अशी घाेषणा केली हाेती. यासंबंधीचा काेणत्याही प्रकारचा शासन निर्णय काढण्यात अाला नाही.
अाज शिव छत्रपती पुरस्काराची घाेषणा
तब्बल तीन वर्षांच्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारांची घाेषणा साेमवारी करण्यात येईल, अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. यामध्ये २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ च्या वर्षातील पुरस्कार विजेत्यांचा समावेश असेल. मागील चार वर्षांपासून या पुरस्कारांची घाेषणा करण्यात अाली नव्हती. त्यामुळे हे पुरस्कार रखडले. यंदा ‘गेट वे अाॅफ
इंडिया’वर विजेत्यांचा गाैरव
यंदा प्रथमच क्रीडा मंत्री विनाेद तावडे यांनी मुंबई येथील गेट वे अाॅफ इंडिया’वर पुरस्कार विजेत्यांच्या गाैरव साेहळ्याचा निर्णय घेतला अाहे. यासाठी १७ फेब्रुवारी राेजी हा साेहळा अायाेजित हाेईल.
असे असतील पुरस्कार
- जीवनगाैरव पुरस्कार
- उत्कृष्ट संघटक (कार्यकर्ता) (विभागनिहाय १)
- सर्वाेत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
- सर्वाेत्कृष्ट खेळाडू पुरस्कार (पुरुष व महिला)
- साहसी पुरस्कार
- एकलव्य पुरस्कार (दिव्यांग)
- जिजामाता पुरस्कार( महिला उत्कृष्ट संघटक, कार्यकर्ता)
यंदापासून जीवनगाैरवसाठी तीन लाखांचे बक्षिस
क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या (६० वर्षांवरील) व्यक्तींना जीवनगाैरव पुरस्काराने गाैरवण्यात येते. यंदा या पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ झाली अाहे. अाता ही रक्कम ३ लाख असेल. या पुरस्कार विजेत्याचा मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.