आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- शहरातील कचरा प्रश्न पुन्हा पेटला आहे. आज (शनिवार) सकाळी सावंगीकडे कचरा भरून जाणाऱ्या महापालिकेच्या वाहनांवर हर्सूल येथे नागरिकांची दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हर्सुल- सांवगीत कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.
महापालिकेची वाहने सावंगी जकात नाक्याशेजारी कचरा टाकण्यास निघाले असता नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. वाहने अडवून त्यावर नागरिकांनी दगडफेक केली. नागरिकांना विरोध पाहून कचऱ्याच्या गाड्या माघारी फिरल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.