आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी गाव, घरं, मंदिर, रस्‍ता आहे; पण गावात चिटपाखरूही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जेथे पूर्वी माणसांची गर्दी होती. गाव होते. मात्र, अनेक अख्‍यायिका, साथरोग, नैसर्गिक आपत्‍ती यामुळे आता ही गावेच्‍या गावे निर्मनुष्‍य झालीत. पण, येथे आजही रस्‍ता, घरे आणि धार्मिक स्‍थळे आहेत. अशा निवडक गावांची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
किल्‍लारी
लातूर जिल्‍हातील हे टुमदार गाव होते. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी आणि परिसरात भूकंप झाला. या आपत्तीने हे परिसरातील गावं होत्याची नव्हती झाली. हजारो कायमचेचे मातीआड झाले. जे वाचले त्‍यांनी गाव सोडले. आजही जुन्‍या किल्‍लारीच्‍या रस्‍त्‍यावर मोठ-मोठी घर आहेत. मात्र, या ठिकाणी कुणीच राहत नाही. गावात हेमाडपंथी मंदिर आहे. जवळच शासकीय निवासस्‍थाने, शाळा आहे. मात्र, या इमारती ओसाड पडल्‍या आहेत.

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, रॉसआयलंड, अंदमान, फतेहपूरशिक्री आणि कुलधराविषयी...