औरंगाबाद- ख्यातनाम कवी, शायर, दिग्दर्शक गुलजार १३ सप्टेंबरला औरंगाबाद शहरात येत आहेत. गुलजार यांनी लिहिलेल्या "मिर्झा गालिब' या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते, अनुवादक अंबरीश मिश्र, प्रकाशक अरुण शेवते यांच्या उपस्थितीत एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात दुपारी चार वाजता होणार आहे. या समारंभास गुलजारही उपस्थित राहणार असून त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे.