आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळकोट- जळकोट (ता. तुळजापूर) ते नंदगाव रोडवर रविवारी (दि. ११) सकाळी ११.३० च्या सुमारास ऊस घेऊन जाणारा ट्रक उलटून त्यातील तीन जण ठार झाले, तर १४ जण जखमी झाले. मृतांत ऊसताेडणीसाठी जाणारे पती-पत्नी व त्यांचा १० वर्षांच्या मुलाचा समावेश अाहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नंदगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची तोड करण्यात येत होती. रविवारी या शेतातील ऊसाची तोड पूर्ण झाली. त्यानंतर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये (एमएच २५ - ८४५७) ऊस भरल्यानंतर त्या ट्रकमध्ये ऊसतोड भरून हा ट्रक धोत्री (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गोकुळ कारखान्याकडे निघाला होता. नंदगावपासून दोन किलोमीटरवर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या एका वाहनाला बाजु देताना ऊसाचा ट्रक उलटला. त्यात राजू मिटू राठोड (वय ३५), ललिता राजू राठोड (वय ३०) स्वप्नील राजू राठोड (वय १०, तिघेही रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) हे तिघे जागीच ठार झाले. हे तिघेही एकाच कुटूंबातील आहेत. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच हंगरगा तांडा येथील ग्रामस्थांनी जखमींना ऊसाच्या ढिगाखालून काढून उपचाराला पाठवण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ तांडा येथील ग्रामस्थ, नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.